Goa Eco Zone Canva
गोवा

Environment Minister Siqueira: गोव्यातील जास्तीत जास्त '63 गावे' जैवसंवेदनशील! पर्यावरणमंत्री सिक्वेरा दिल्लीला जाणार

Goa Eco Sensitive Area: जैवसंवेदनशील विभागासंदर्भातील मसुदा अधिसूचनेत समाविष्ट राज्यातील १०८ गावांपैकी जास्तीत जास्त गावे वगळणे सरकारने प्रतिष्ठेचे केले आहे. प्रत्यक्षात यातून केवळ १८ गावेच वगळली जाऊ शकतात, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिल्यानंतर सरकारने आता सादरीकरणावेळी पर्यावरणमंत्री सिक्वेरा यांनाच दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जैवसंवेदनशील विभागासंदर्भातील मसुदा अधिसूचनेत समाविष्ट राज्यातील १०८ गावांपैकी जास्तीत जास्त गावे वगळणे सरकारने प्रतिष्ठेचे केले आहे. प्रत्यक्षात यातून केवळ १८ गावेच वगळली जाऊ शकतात, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिल्यानंतर हादरलेल्या सरकारने आता सादरीकरणावेळी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनाच दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि समितीच्या काही सदस्यांसह सिक्वेरा उद्या (ता.१३) दिल्लीला रवाना होणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारांनी सादर केलेले दावे तपासण्यासाठी माजी महासंचालक संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्या समितीसमोर सोमवारी (ता.१४) राज्य सरकारकडून सादरीकरण करण्यात येणार आहे.

समुद्र सपाटीपासून नसलेली विशिष्ट उंची आणि नसलेली भौगोलीक सलगता अशा मुद्यांवर राज्य सरकारकडून भर देण्यात येत आहे. यापूर्वीही राज्य सरकारने याच मुद्यांच्या आधारे केंद्र सरकारच्या मसुदा अधिसूचनेला विरोध केला होता. केरळ सरकारने जैवसंवेदनशील मसुदा अधिसूचनेत नोंद असलेली काही गावे वगळण्यासाठी शास्त्रीय अभ्यास करून सल्ला देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली होती. त्या समितीने दिलेला अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने ग्राह्य धरला होता. त्या आधारे केरळमधील काही गावे मसुदा अधिसूचनेतून वगळली आहेत.

सुजीतकुमार डोंगरे अनुपस्थित

गावे वगळण्याची शिफारस करण्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचे माजी महासंचालक डॉ. देवेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तेही सोमवारच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या समितीचे निमंत्रक सुजीतकुमार डोंगरे हे सध्या जॉर्जियाच्या दौऱ्यावर असल्याने ते दिल्लीतील बैठकीला उपस्थित नसतील.

...तर खाणकामावर येणार गंडांतर

राज्य सरकारने जास्तीत जास्त ६३ गावे जैवसंवेदनशील जाहीर होऊ शकतात, अशी भूमिका घेतली आहे. ९९ गावे म्हणजे १ हजार ४६१ चौरस किलोमीटरचा टापू जैवसंवेदनशील ठरणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यात आता वाढ झाली आहे. तसे झाल्यास खाणकामावर गंडांतर येईल, म्हणून सरकार घाबरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT