Goa Government Schools  Dainik Gomantak
गोवा

Goa Government Schools : सरकारी शाळांच्या स्थितीस सरकारच जबाबदार; बर्डेंचा निशाणा

राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा घसरण्यास व विद्यमान स्थिती उद्भवण्यास राज्य सरकारचे धोरणच जबाबदार आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा घसरण्यास व विद्यमान स्थिती उद्भवण्यास राज्य सरकारचे धोरणच जबाबदार आहे. दुसरीकडे सरकारने या शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याचा प्रस्ताव आणला आहे, पण मोजक्याच सैनिकांची नावे या शाळांना लागतील व त्यामुळे इतरांवर हा अन्याय असेल. सरकारने विचारपूर्वक असे प्रस्ताव आणले पाहिजेत, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी व्यक्त केले.

आमचा या प्रस्तावाला विरोध नाही, परंतु इतर स्वातंत्र्यसैनिकांवर हा अन्याय नाही का? असा सवाल उपस्थित करीत बर्डेंनी या प्रकारामुळे भेदभावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. शनिवारी म्हापसा येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सितेश मोरे व प्रशांत जाधव उपस्थित होते. सध्या सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी होत असून याला सरकारचे धोरण जबाबदार आहे, असेही बर्डे म्हणाले.

मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना हवी

सध्या राज्यात कथित अपहरणाची प्रकरणे समोर येताहेत. त्यामुळे सरकारने शाळकरी मुलांना सुरक्षा पुरविण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजेत. कारण ही मुले देशाचे भवितव्य आहेत. याशिवाय रस्त्यांवर तसेच शाळेच्या आवारातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत आवश्यकता असल्याचे बर्डे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT