Pratap Singh Rane

 

Dainik Gomantak 

गोवा

प्रतापसिंग राणेंना आजीवन कॅबिनेट दर्जा, गोवा सरकारचा निर्णय

हल्लीच प्रतापसिंग राणेंनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत यावेळी पर्ये मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले होतं.

दैनिक गोमन्तक

पर्ये: आमदार प्रतापसिंग राणे (Pratap Singh Rane) यांना‌ आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, गोव्यात असा‌ निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. प्रतापसिंह राणे यांनी आमदार म्हणून 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात त्यांनी आमदार(MLA), मंत्री, मुख्यमंत्री, सभापती तसेच विरोधी पक्षनेते अशी अनेक पदे भूषविली आहेत. हल्लीच त्यांनी राजकारणातून (Politics) निवृत्ती घेत यावेळी पर्ये मतदारसंघातून निवडणूक (Election) न लढवण्याचे जाहीर केले आहे.

राजकीय निवृत्तीची सुरू होती चर्चा

मागील काही महिन्यात गोव्याच्या राजकारणात कमालीचा बदल झालेला आपल्याला दिसून आला. अनेक राजकीय नेते पूर्वीचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात दाखल झाले. यातच मध्यंतरी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे (Pratap Singh Rane) हे आमनेसामने आल्याचे वृत्त समोर आले होते. पण वडील-मुलगा आमनेसामने नसल्याचे प्रतापसिंग राणे यांनी सांगितल्यावर ह्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण आता प्रतापसिंग राणे हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे सर्वत्र म्हंटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bomb Threat: मोठी बातमी! पणजीतील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची धावपळ अन् परिसरात भीतीचे वातावरण

भिजत पडलेलं युतीचं घोंगडं कधी सुकणार? जनतेला हवाय 'सक्षम पर्याय'; विरोधकांनो स्ट्रॅटजी बदला!

IND vs WI: "वर्ल्ड कपमध्ये असल्या तमाशांची काय गरज?" ईडन गार्डन्सवरील हाय-व्होल्टेज सामन्यातील 'लेझर शो'वर भडकले शास्त्री-गावस्कर

इराक, व्हेनेझुएला आणि आता इराण... अमेरिकेच्या 'हिटलिस्ट'वरचा पुढचा नंबर कोणाचा?- संपादकीय

सां जुझे आरियल ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोप; सप्टेंबरनंतर एकही ग्रामसभा घेतली नसल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले

SCROLL FOR NEXT