Sunburn Festival Dainik Gomantak
गोवा

डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला सरकारकडून रोख..!

मात्र आता सनबर्न फेस्टीवलवर (Sunburn Festival) प्रमोद सावंत सरकारने रोख लावला आहे.

दैनिक गोमन्तक

आशियातील प्रसिद्ध सनबर्न संगीत महोत्सवाची (Sunburn Festival) पर्वणी डिसेंबरात वागातोर पठारावर आशियातील सर्वात मोठा संगीत महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनबर्न फेस्टिवलचे येत्या 28 ते 30 डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता सनबर्न फेस्टीवलवर प्रमोद सावंत सरकारने रोख लावला आहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टीवलला रोख लावला आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द केल्याने लाखों संगीत प्रेमींबरोबरच राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलापासून वंचित रहावे लागणार आहे. यंदाच्या महोत्सवात जागतीक किर्तीचे संगीतकार बुलझेये, ह्युमन, अर्जुन वागाले, डॉटडेट, त्याचबरोबर डीजे संजय दत्ता तसेच लोकोजेम यांचा समावेश होणार होता. कोवीड नियमावलीचे पालन करीत मर्यादित संगीत प्रेमींच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. मात्र आता हा फेस्टीवल होत नसल्याने लाखो सनबर्नप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT