पणजी: गोव्यातील वाढत्या गंभीर प्रश्नांमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. राज्यपालांनी संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करावे आणि गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे निवेदन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकभवन येथे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेत दिले.
आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते. या भेटीत काँग्रेस नेत्यांनी राज्यापालांशी प्रशासनातील अपयश, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती, पर्यावरणाची होत असलेली हानी तसेच गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीवर निर्माण झालेले धोके याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले व इतर अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.
राज्यात तिसरा जिल्हा करण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु त्याची गोव्याला आवश्यकता आहे का? तिसरा जिल्हा केल्यास त्याचा आर्थिक भार गोव्यावर किती पडेल ? लोकसंख्येची विभागणी योग्य प्रकारे होईल का ? अशा विषयांचा अहवाल आम्ही मागितला होता, परंतु तो पुरविण्यात आला नाही, असे आलेमाव यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने ‘क्रॉस’ मतदान केले, असा आरोप ज्यांनी केला आहे, त्यांची विश्वासार्हता आधी तपासा, असा सल्ला बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी दिला.
आम आदमी पार्टीचे धोरण भाजपविरोधी असून या धोरणात कधीही बदल होणार नाही असे ते म्हणाले. यापूर्वी भाजपाला कोण जवळ होते, हे सर्वांनी पाहिलेले आहे. आमची भूमिका नेहमीच स्पष्ट आहे, असे व्हिएगस म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.