पणजी: गोव्यातील गजबजलेल्या बाजारात उन्हाळी फळांच्या रंगांची आणि गोड सुगंधांची रेलचेल सुरू झाली आहे. सध्या बाजारात पीक कमी असल्याने या हंगामातील बहुप्रतिक्षित पिकांच्या किमती महागले आहे. महत्वाचं म्हणजे बहुचर्चित मणकुराद आंब्यासाठी ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागतेय. सध्या बाजारात मानकुरद आंब्यांची किंमत प्रति किलो ५,००० ते ६,००० रुपये आहे. गोव्याचे हे आलिशान फळ आंबाप्रेमींसाठी एक उच्च-स्तरीय आनंद ठरतोय.
माणकुराद आंबा महाग असल्याने ज्यांना सध्या परवडणारा पर्याय हवा असल्यास त्यांच्यासाठी, तोतापुरी आंबे प्रति किलो १५०-२०० रुपये दराने सहज उपलब्ध आहे. या आंब्याच्या प्रकारांसोबतच इतर पारंपारिक गोव्याची फळे बाजारात दाखल झाली आहेत.
घोटं हे एक स्थानिकांचं आवडते फळ सध्या प्रति किलो ४०० रुपये दराने विकले जात आहे, तर कच्चा गावठी आंबा ८ तुकड्यांसाठी १०० रुपये दराने उपलब्ध आहे. गोव्यातील बाजारांमध सीताफळ प्रति किलो २०० रुपये दराने आणि गरे प्रति पॅकेट १५० रुपये दराने उपलब्ध आहे.
या हंगामात ताज्या काढलेल्या काजूंची देखील उपलब्धता निर्माण झालीये, या काजूंची किंमत प्रति किलो ३००-४०० रुपये आहे. स्थानिक फळे आणि काजूंची विविध श्रेणी गोव्याच्या समृद्ध कृषी वारशाचे प्रतीक आहे. उन्हाळ्यात गोव्यात येणाऱ्या प्रत्येकासाठी ही फळ एक रुचकर चव प्रदान करते. माणकुराद आंब्याची महाग किंमत काहींना परवडणारी नसली तरी, इतर फळांची विस्तृत निवडीमुळे प्रत्येकाला या हंगामाच्या चवीचा आनंद नक्कीच घेता येतो. बाजारातील उन्हाळी फळांच्या खरेदीचा उत्साह गोव्यात गोड आणि फळदायी उन्हाळ्याची सुरुवात दर्शवतोय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.