पणजी: राज्यात जातनिहाय जनगणना १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार असून, त्यानंतर ५ ते ९ जानेवारी २०२७ या कालावधीत पुनरावृत्ती फेरी घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या रजिस्ट्रार जनरल यांनी केंद्रीय राजपत्रात तसा आदेश प्रकाशित केला आहे. यामुळे विधानसभा निवडणूक फेब्रुवारीच्या अखेरीस होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढील वर्षी जनगणना होणार असल्याचे गृहित धरून विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या अखेरीस घेण्याची शक्यता चर्चेत होती. केंद्र सरकारच्या आजच्या आदेशामुळे त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशातील आगामी जनगणनेबाबत केंद्राने महत्त्वाची घोषणा केली असून, गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांसाठी तसेच उत्तराखंडच्या हिमाच्छादित भाग वगळता अन्य क्षेत्रांसाठी ५ जानेवारी २०२७ रोजी मध्यरात्री १२ वाजता जनगणनेची संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली आहे.
गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब...
केंद्र सरकारने यापूर्वी १६ जून २०२५ रोजी काढलेली अधिसूचना अधिक्रमित करून भारताची जनगणना २०२७ मध्ये घेण्याचे नव्याने जाहीर केले आहे. देशासाठी सर्वसाधारण जनगणनेची संदर्भ तारीख १ मार्च २०२७ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, काही हिमाच्छादित भागांसाठी १ ऑक्टोबर २०२६, तर गोव्यासह उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी ५ जानेवारी २०२७ ही स्वतंत्र संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.