मडगाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांची घाईघाईने केलेली बदली हे भाजप आपला विभाजनकारी अजेंडा सुरक्षित करण्यासाठी प्रशासनात कसा हस्तक्षेप करत आहे याचे आणखी एक स्पष्ट उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
फक्त बजरंग दल नेत्यांना संरक्षण देण्यासाठीच हा सर्व उपद्व्याप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अधीक्षक सुनीता सावंत यांनी गोव्यातील बजरंग दल नेत्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा सरकारने घाबरून त्यांची तत्काळ बदली केली. यावरून स्पष्ट होते की भाजपला प्रशासनात रस नाही तर त्यांच्या वैचारिक सहयोगींना संरक्षण देण्यात आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात रस आहे, अशी टीका त्यांनी केली.
हे सरकार पोलिस दलाचा वापर कायद्याचे रक्षण करण्याऐवजी भाजपच्या राजकीय हितसंबंधांसाठी करत आहे. सावंत यांची ही बदली म्हणजे प्रामाणिकपणे काम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यासारखे आहे, असे पाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.