Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सुनीता सावंत यांच्या बदलीवरुन आता राजकारण; सरकार बजरंग दल नेत्यांना संरक्षण देत असल्याचा काँग्रेसचा आरोप

South Goa SP: सरकार पोलिस दलाचा वापर कायद्याचे रक्षण करण्याऐवजी भाजपच्या राजकीय हितसंबंधांसाठी करत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांची घाईघाईने केलेली बदली हे भाजप आपला विभाजनकारी अजेंडा सुरक्षित करण्यासाठी प्रशासनात कसा हस्तक्षेप करत आहे याचे आणखी एक स्पष्ट उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

फक्त बजरंग दल नेत्यांना संरक्षण देण्यासाठीच हा सर्व उपद्व्याप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अधीक्षक सुनीता सावंत यांनी गोव्यातील बजरंग दल नेत्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा सरकारने घाबरून त्यांची तत्काळ बदली केली. यावरून स्पष्ट होते की भाजपला प्रशासनात रस नाही तर त्यांच्या वैचारिक सहयोगींना संरक्षण देण्यात आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात रस आहे, अशी टीका त्यांनी केली.

Amit Patkar Post

हे सरकार पोलिस दलाचा वापर कायद्याचे रक्षण करण्याऐवजी भाजपच्या राजकीय हितसंबंधांसाठी करत आहे. सावंत यांची ही बदली म्हणजे प्रामाणिकपणे काम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यासारखे आहे, असे पाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT