Goa Assembly session  Dainik Gomantak
गोवा

विधानसभा अधिवेशन किती कार्यक्षम?

‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात प्रकाश कामत आणि एल्विस गोम्स यांचा सवाल

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा होत नाही. विरोधक सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक होत नसतील तर अधिवेशन कार्यक्षम आहे का अशी शंका येते, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत आणि माजी सनदी अधिकारी तथा काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी व्‍यक्‍त केले. ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी ‘अधिवेशन किती कार्यक्षम’ या विषयावर मान्यवरांशी चर्चा केली.

प्रकाश कामत म्हणाले, पत्रकार या नात्याने मी गेली 30 ते 35 वर्षे अधिवेशनाचे वार्तांकन केले आहे. लोकांचे प्रश्न आणि समस्या सभागृहात मांडणे विरोधकांचे प्रमुख काम आहे. पूर्वी विरोधक सरकारला सळो की पळो करून सोडत होते. सध्या तसे काही दिसत नाही. रमाकांत खलप, काशिनाथ जल्‍मी यांच्‍यासारखे विरोधी नेते सरकारला विविध प्रश्‍नांवरून हैराण करून सोडत होते. अधिवेशनाच्‍या माध्यमातून आपण केलेली कामे लोकांसमोर मांडण्याची सरकारला संधी असते. तसेच लोकहिताची कामे, निर्णय आदींची माहिती देण्याचे उत्तम व्‍यासपीठ असते. पण सध्या उलटेच घडत आहे. विरोधक थंडावले आहेत, तर सत्ताधाऱ्यांची अधिवेशन गुंडाळण्याची गडबड सुरू आहे.

पूर्वी काशिनाथ जल्मी, रमाकांत खलप, मनोहर पर्रीकर यांच्यासारखे विरोधक सरकारला जेरीस आणत. पण आता सगळे काही साटेलोटे असल्यासारखे दिसत आहे. या सभागृहात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. ही संख्या काही कमी नाही. सरकारला घेरण्यासाठी इतके लोक पुरे आहेत. पण आता तसे चित्र दिसत नाही, असे गोम्स म्हणाले. लोकांची अपेक्षा समजू शकतो पण निवडून आलेल्‍या लोकप्रतिनिधींनी सत्तेत असो वा नसो लोकांसाठी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी ठेवायला हवी, असे कामत म्‍हणाले.

...तरीही कामे करणे शक्य येतात

आता प्रत्येकाला सत्तेची लालसा का, असा सवाल राजू नायक यांनी केला असता कामत म्हणाले, आजकाल लोकांना आपला आमदार सत्तेत असेल तरच कामे होतील असे वाटू लागले आहे. अर्थात धमक असेल तर विरोधात राहूनही कामे करता येतात.

विरोधकांचे मौन घातक

एल्विस गोम्स म्हणाले, सभागृहात सध्या विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण, हेच कळेनासे झाले आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील सीमारेषा धूसर झाली आहे. पूर्वी विधानसभेचे अधिवेशन एक ते दीड महिना चालायचे. आता विरोधक सभागृहात काही बोलत नाहीत आणि सरकारलाही अधिवेशन नको आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT