Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Goa CM Dr. Pramod Sawant: गोव्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत मोठी आणि कठोर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी केली.

Manish Jadhav

पणजी: राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत मोठी आणि कठोर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना, त्यांनी सर्व शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी केली जाईल आणि जे पात्र ठरणार नाहीत त्यांना सेवेतून काढून टाकले जाईल, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सरकारी आणि अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांची (Teacher) शैक्षणिक पात्रता तपासली जाईल. जे शिक्षक शिक्षण देण्यासाठी पात्र नाहीत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सेवेत ठेवले जाणार नाही. अशा अपात्र शिक्षकांना घरी पाठवले जाईल." मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दरम्यान, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या पात्रतेबाबत आणि शिक्षण पद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार आणि अनियमितता दूर होऊन गुणवत्तेला प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

पडताळणी प्रक्रिया आणि संभाव्य परिणाम

शिक्षण विभाग लवकरच या पडताळणी मोहिमेला सुरुवात करणार आहे. या प्रक्रियेमध्ये शिक्षकांच्या पदवी, व्यावसायिक पात्रता आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाईल. ज्या शिक्षकांची कागदपत्रे संशयास्पद आढळतील किंवा जी आवश्यक निकषांची पूर्तता करत नाहीत, त्यांची सेवा समाप्त केली जाईल.

या निर्णयाचा अनेक शिक्षकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, विशेषतः ज्यांची नियुक्ती मागील काळात वादग्रस्त ठरली होती. एका बाजूला, पालक आणि विद्यार्थी या निर्णयाचे स्वागत करतील, कारण यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल. तर दुसऱ्या बाजूला, शिक्षक संघटना आणि काही शिक्षकांकडून यावर विरोध होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

शिक्षण धोरणाचे महत्त्व

गोव्याने (Goa) नुकतीच 100 टक्के साक्षरता मिळवल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ साक्षरता वाढवणेच नाहीतर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे हे सरकारचे ध्येय असल्याचे यातून दिसून येते.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे गोव्याच्या शिक्षण पद्धतीत मोठे बदल अपेक्षित आहेत. हा निर्णय पारदर्शक आणि न्यायपूर्ण पद्धतीने राबवल्यास, तो राज्यातील शैक्षणिक क्रांतीचा पाया ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT