Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: ‘स्‍मार्ट सिटी’वरून बाबूश-उत्पलमध्ये जुंपली

25 वर्षे कामेच झाली नाहीत : मोन्सेरात; पणजीत नियोजनशून्य कारभार : पर्रीकर

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City: शहरात स्मार्ट सिटी आणि ‘जी-२०’ परिषदेनिमित्त कामे सुरू आहेत. त्यात स्मार्ट सिटीची कामे रेटण्यावर इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास महामंडळाने भर दिला आहे.

एका बाजूला पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे गेल्या 25 वर्षांत कामेच झाली नाहीत असे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला सध्या जी कामे सुरू आहेत, त्यात नियोजनशून्यता दिसते, असे उत्पल पर्रीकर म्हणतात. सध्या स्मार्ट सिटीच्या कामांवरून या दोन्ही नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगला आहे.

पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवात झाली ती मागील वर्षी. त्याच दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्यालाही जाग आल्याने त्यांनी मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू केले आणि जिकडे-तिकडे रस्ते खोदले होते.

छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर संकट

पणजी शहरातील कामे पूर्ण होईपर्यंत जनतेने थोडा संयम बाळगावा. गेली २५ वर्षे ही कामे रखडलेली होती. रोज कोणती ना कोणती समस्या निर्माण होतच आहे. गटारांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. आम्हाला आमच्या मतदारसंघातील लोकांची काळजी आहे. - बाबूश मोन्सेरात.

लोकांची चिंता न करता कामे सुरू करणे योग्य आहे का? सर्व शहरच खोदल्यामुळे लहान व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. रात्री दोन वाजेपर्यंत कामे केली जातात. त्याविषयी तक्रारी येतात आणि मग पोलिसांना ती कामे बंद करावी लागतात. हे कुठेतरी चुकत आहे.

- उत्पल पर्रीकर.

महापौरही सावध

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सर्व जबाबदारी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अभियंत्यांवर ढकलली होती. त्यांचे सुपुत्र तथा महापौर रोहित मोन्सेरात यांनीही ‘हात’ वर करत महापालिकेचा त्यात काहीच संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी, बाबूश व रोहित यांचे नाव न घेता बाप-लेकाने पणजी खड्ड्यात घातल्याची टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT