Power Cut Issue in Palolem Dainik Gomantak
गोवा

Power Cut Issue in Palolem: सततच्या विजेच्या लपंडावामुळे पाळोळेतील रहिवाशी संतप्त; वीज विभागात नागरिकांची धाव

पाळोळेमध्ये सतत वीज जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

Power Cut Issue in Palolem: गोव्यात पावसाळा सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू होतो. मात्र यामुळे लोकांना दैनंदिन आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाळोळेमध्ये सतत वीज जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गावात वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत रहिवाशांंनी व्यक्त केले आहे. सततच्या विजेच्या लपंडावामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी अखेर काणकोण वीज विभागाचे सहाय्यक अभियंता गोविंद भट यांची भेट घेतली आणि त्यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या निवेदनावर कारवाई करण्याची मागणी केली.

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा केवळ विद्युत उपकरणांवरच परिणाम होत नाही, तर आपले आर्थिक नुकसानही होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, सासष्टी तालुक्यातील ग्रामीण तसेच किनारी भागातील रहिवासी विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहेत. येथील परिसरातील वीजपुरवठा अनेकवेळा गुल्ल होण्याचा प्रकार घडत आहे. अशाने येथील रहिवाशांना उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. याबरोबरच येथील व्यवसायावरही विपरित परिणाम होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT