Konkan Railway  Dainik Gomantak
गोवा

Konkan Railways : कोकण रेल्वेच्या चार गाड्या येत्या आठवड्यापासून विजेवर धावणार

कोकण रेल्वेतून होणारा प्रवास आता वेगवान होणार आहे.

सुशांत कुंकळयेकर

Konkan Railways : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कोकण रेल्वेतून होणारा प्रवास आता वेगवान होणार आहे. येत्या आठवड्यापासून या मार्गावरील चार गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत. त्यानंतर हळूहळू या मार्गावरून सर्व गाड्या विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

सध्या पहिल्या टप्प्यात 20 सप्टेंबर पासून त्रिवेंद्रम पासून सुटणारी नेत्रावती एक्स्प्रेस विजेवर चालणार असून परतीची 22 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणारी नेत्रावती विजेवर धावणार आहे. 22 सप्टेंबर रोजी कोचुवेली पासून सुटणारी कोचूवेली - एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी विजेवर धावणार असून 23 रोजी मुंबईहून सुटणारी परतीची गाडी विजेवर चालणार आहे. दोन महिन्यांपूर्वी कोंकण रेल्वेच्या पूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाले होते.

दरम्यान कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर टप्प्याटप्प्यात विजेवर चालणाऱ्या गाड्या धावू लागणार आहेत. सध्या मुंबई ते रत्नागिरी आणि कारवार ते बंगळुरु या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या गाड्या सुरू झाल्या आहेत.

कोकण रेल्वे (Konkan Railways) मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती. एकूण 6 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात आले. रत्नागिरी ते थिवी या शेवटच्या टप्प्याचे काम या मार्च महिन्यात पूर्ण होऊन 28 मार्च रोजी रेल्वे सुरक्षा मंडळाने त्याला हिरवा कंदील दाखवला होता. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कोकण रेल्वेचे अभिनंदन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात रंगणार 9वा 'Aqua Goa Mega Fish Festival'; मच्छिमारांच्या प्रगतीसाठी 40% सबसिडीची घोषणा

अग्रलेख: गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही आपल्याला शेतं, डोंगर, पाण्याचे स्रोत, समुद्र किनारे यावर चर्चा करावी लागते, यासारखे दुर्दैव नाही

Harvalem: 'रवींच्या स्वप्नासाठी भंडारी समाजाने एकत्रित यावे'! ब्रह्मेशानंद स्वामींचे आवाहन; रुद्रेश्वर रथयात्रा वर्षपूर्ती सोहळा साजरा

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: तुये हॉस्पिटल 100% 'जीएमसी'शी जोडले जाणार

SCROLL FOR NEXT