रोहन खंवटे  Dainik Gomantak
गोवा

‘फायबर टू होम’ कनेक्टिव्हिटी लवकरच: रोहन खंवटे

प्रत्येक घरामध्ये कनेक्शन पोहचणे गरजेचे

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील शहराबरोबरच ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे. कोविड काळात ही समस्या जाणवली आहे. वीज व पाणी कनेक्शनप्रमाणेच आता इंटरनेट कनेक्शन प्रत्येक घरामध्ये पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर ‘फायबर टू होम’ प्रकल्प राज्यात सुरू करून प्रत्येक घराघरांत ही कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी आज दिली.

फायबर टू होम कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला उशीर झाला आहे. त्याचा पूर्णपणे आढावा घेऊन त्याची पुन्हा शिफारस केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यत यासंदर्भात बैठक घेतल्यानंतरच राज्यातील कनेक्टिव्हिटीची स्थिती व या प्रकल्पाचा स्थिती याची माहिती कळल्यावर पुढील पावले उचलण्यात येतील. राज्यात कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याचे मान्य करून मंत्री खंवटे म्हणाले, भाजप सरकारने मोबाईल टॉवर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर कनेक्टिव्हिटीसंदर्भातील सर्व प्रश्‍न सोडविले जातील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागील सरकारमध्ये या धोरणाचा मसुदा उपलब्ध केला होता. त्यामध्ये सरकारी इमारतींचा वापर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी करण्याचे ठरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT