Goa Road Condition Dainik Gomantak
गोवा

Panjim Road Condition: राज्यातील रस्ते खड्डेमय, धुळीमुळे नागरिक त्रास्त

Panjim Road Condition: पणजी शहरातील सांतिनेज ते तांबडीमातीपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे काम सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim Road Condition: पणजी शहरातील सांतिनेज ते तांबडीमातीपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे काम सुरू आहे. खोदलेल्या गटाराची माती बाजूलाच टाकली असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे ती रस्त्यावर पसरली जात आहे. त्याशिवाय काही ठिकाणी दगडमातीने भरलेले खड्डे पुन्हा होत्या त्या स्थितीत आले आहेत.

त्यामुळे मोठ्या वाहनांमुळे या मार्गावर धूळ उडत असून त्याचा दुचाकीस्वारांना त्रास होत आहे. सांतिनेजमध्ये मागील काही महिन्यांत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी व चेंबर बांधण्यासाठी काम सुरू असताना दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागला होता. आता सांतिनेजमधील विवांता हॉटेलच्या चौकापासून ते आरबीआय अधिकाऱ्यांच्या बंगल्यापर्यंत गटाराचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढे ‘वाय’ चौकातून सरकारी वसाहतीपासून स्मशानभूमीपर्यंत गटाराचे काम सुरू आहे.

जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम करण्यात आले असून माती रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आली आहे. सांतिनेजमधील काही सोसायटीतील नागरिकांना नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. नगरसेवकांनी तक्रारी ऐकून घेतल्या असल्या तरी गटाराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT