NEET Exam Dainik Gomantak
गोवा

NEET Exam : पेपरफुटीमुळे नीट परीक्षा नव्याने घ्या : नौशाद चौधरी

NEET Exam : एनएसयूआयची पत्रकार परिषदेद्वारेे मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

NEET Exam :

पणजी, डॉक्टर होणे अनेकांचे स्वप्न असते, परंतु त्या स्वप्नांशी खेळण्याचा प्रकार घडत आहे. देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या नीट परीक्षेला यंदाचा पेपर बिहारमध्ये फुटल्याने परीक्षा प्रक्रियेवर संशय व्यक्त होत आहे.

देशभरातून या परीक्षेला २३ लाख विद्यार्थी बसले होते, तर गोव्यातून सुमारे ४ हजार विद्यार्थी बसले होते, परीक्षा प्रक्रियेत बिघाडामुळे दिलेले अतिरिक्त गुण आदींमुळे एकाच केंद्रात सात जणांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत, त्यामुळे नीट परीक्षा पुन्हा नव्याने आयोजित करण्यात यावी, अशी मागणी एनएसयूआयचे नौशाद चौधरी यांनी केली.

पणजीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फक्रुद्दीन मुजावर, नीरज नाईक आदी उपस्थित होते. चौधरी पुढे म्हणाले, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक पालक नीट परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी ऋण काढून कोचिंग देतात.

त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर परिणाम होतो. नीट परीक्षा ७२० गुणांची असते परंतु यंदा ६५० गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला देखील एम्स दिल्ली येथे प्रवेश मिळणे कठीण झाले आहे,

धरणे आंदोलनाचा इशारा

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ५२० ते ५५० गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा. परंतु यंदा मोठ्या प्रमाणात गुण वाढल्याने गोमंतकीय विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय दिला जात नाही, तोपर्यंत आम्ही लढणार आहोत. नीट परीक्षा नव्याने घेण्यात यावी, यासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT