Fish Market Price Incresed  Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: बाजारात आवक घटल्याने मासळी महागली!

Goa Fish Market: इसवण १०००, बांगडे ४०० किलो तर पापलेट ८०० रुपये वाटा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fish Market: राज्यात मासेमारी बंदी सुरू झाल्याने बाजारात मासळीची आवक घटली आहे अशातच मत्सप्रेमी खवय्यांना मासळीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. राज्यात सध्या मुबलक मासळी नसल्याने तसेच आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पणजी बाजारात मोठे बांगडे ४०० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. तर लहान बांगडे ३०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. सर्वसामान्यांना आवडणारी तार्लीचे दर ३०० रुपये प्रती किलो झाले आहेत. इसवण १ हजार रुपये किलो तर मध्यम आकाराचे पापलेट ८०० रुपये प्रती वाटा दराने विकले जात आहेत. कोळंबी (सुंगठे) ४५० रुपये किलो, लेपो आकाराप्रमाणे २५० ते ४०० रुपये किलो दराने विकले जात आहे.

आज पणजी बाजारात बांगडा, तारली, खुबे, कोळंबी, इसवण, पापलेट, लेपो, आदी विविध प्रकारचे मासे उपलब्ध होते. मंगळवार असल्याने बाजारात मासळी खरेदीसाठी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, परंतु मासळीचे वाढलेले दर पाहून अनेकांना खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत असे सर्वसामान्यपणे जो ग्राहक मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी करत होता, तो देखील खरेदी करताना विचार करत होता.

अस्वच्छतेचे साम्राज्य

पणजीतील मासळी बाजारात प्रवेश करतानाच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दृष्टीस पडते गोव्याच्या राजधानीचे खासकरून स्मार्ट सिटीच्या मासळी बाजाराची ही अवस्था असल्याने आश्‍चर्य वाटते. या अस्वच्छतेवर महानगरपालिकेने काही उपाय योजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT