सासष्टी: मडगावात प्रत्येक सरकारी कचेऱ्यांच्या परिसरात भंगारात आलेली अनेक वाहने व मशिनरी गेल्या १५ ते २० वर्षांपासून धूळ खात पडलेली आहेत. काही वाहनांवर माती साचलेली आहे तर काही वाहने व मशिनरी झाडा झुडुपांत रुतलेली आहेत.
रस्त्यावरील लोकांनी टाकून दिलेली वाहने मध्यंतरी उचलली जात होती. सरकारने स्वतःची भंगार वाहने व मशिनरीचा लिलाव करावा अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत.
मडगावमधील नागरिक दिनेश काकोडकर यांनी सांगितले की, जलस्रोत, सार्वजनिक बांधकाम, वीज, वाहतूक, पर्यटन, नगरपालिका या सरकारी खात्याच्या कचेऱ्यांच्या आजूबाजूला नजर टाकली तर कित्येक गाड्या अशा पडून असलेल्या दिसतात. मडगावातच अशी ५० ते ६० वाहने आहेत. या वाहनांचा लिलाव केला तर त्यातून सरकारच्या तिजोरीत थोडातरी पैसा जमा होईल. तसेच जागा रिकामी होईल व पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल, असे काकोडकर यांनी सांगितले.
संपूर्ण गोव्यात अशी भंगार झालेली हजारो वाहने असतील असे काकोडकर यांचे म्हणणे आहे. सरकारचे याकडे लक्ष जात नाही तेव्हा आमच्यासारख्या लोकांना ते सरकारच्या लक्षात आणून द्यावे लागते, असेही काकोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.