Hotel Silver Sand Dainik Gomantak
गोवा

अखेर 'सिल्वर सँड्स' हॉटेल पाडण्याचे काम सुरु

सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून त्याचे बांधकाम झाल्याचा दावा उचलून धरुन ते जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला होता.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल दोन महिन्यांनी काल पासून कोलवा येथील सिल्वर सँडस हे बहुमजली हॉटेल पाडण्याचे काम सुरु झाले आहे.गोवा किनारी व्यवस्थापनानै सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून त्याचे बांधकाम झाल्याचा दावा उचलून धरुन ते जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला होता.

(demolition work of 'Silver Sands' Hotel started in colva)

त्याला संबंधितांनी आव्हान दिले व हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले पण मूळ आदेश उचलून धरला गेला. पण विविध कारणास्तव अंमलबजावणी अडली होती. साबांखाने हॉटेल पाडण्यासाठी येणार असलेल्या साधारण सोळा लाख खर्चाचा प्रस्ताव सादर केला व त्यानंतर काल त्या कामासाठी आवश्यक असलेली अवजड यंत्रसामुग्री दाखल होऊन नंतर काम सुरुही झाले.

काय आहे प्रकरण

सासष्टी तालुक्यातील कोलवा येथील हॉटेल सिल्वर सँड्सचे बांधकाम पाडण्याचा गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) आदेश 25 ऑक्टोबर 2021 दिला होता. या आदेशाला हॉटेलच्या संचालकांनी आव्हान दिले होते. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळत दणका दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT