Rumdamol Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Panchayat: रुमडामळ येथील मदरशाला स्थानिकांचा विरोध कायम; पंच सदस्याच्या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरुवात

आज झालेल्या ग्रामसभेतही हा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.

दैनिक गोमन्तक

Rumdamol Panchayat Madrasah : रुमडामळ पंचायत परिसरात मदरशाचा मुद्दा काही केल्या मिटण्याचे नाव घेत नाही. बेकायदा मदरशामुळे त्रास होत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी ग्रामसभेत मांडली होती. या पंचायत क्षेत्रात असलेली मदरसा बंद करावी अशी मागणी स्थानिक अजूनही करत आहेत. आज झालेल्या ग्रामसभेतही हा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.

रुमडामळ पंचायतीने आज ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी पुन्हा एकदा मदरसा बंद करण्याची मागणी स्थानिकांनी ग्रामसभेत केली. गावात असलेली मदरसा बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे अशी भूमिका स्थानिकांनी ग्रामसभेत मांडली.

मदरसा बेकायदेशीर असून हे बंद न झाल्यास तिथे डुक्कर आणून टाकणार असे वक्तव्य पंच सदस्याने केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, या मदरशाला पुर्वीच्या पंचायत कौन्सिलने मान्यता दिली होती. यातून लोकांना लाभ होत असून मंत्र्यांनी सुद्धा इथे भेटी दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता याबाबत अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT