Michael Lobo News Dainik Gomantak
गोवा

बेकायदेशीर धर्मांतर करणारे लोक गोव्याच्या बाहेरून येतात : मायकल लोबो

बेकायदेशीर धर्मांतरामुळे दोन धर्मांमध्ये मतभेद निर्माण होतात : लोबो

दैनिक गोमन्तक

म्हापसा: काँग्रेस पक्ष बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या लोकांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. आम्ही बेकायदेशीर धर्मांतराचा कडाडून विरोध करतो, असे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सोमवारी स्पष्ट केले. (Congress do not support illegal conversions says Michael Lobo)

लोबो पुढे म्हणाले, "बेकायदेशीर धर्मांतरामुळे ख्रिश्चन धर्माचे नाव खराब होत आहे. यात कोणती मंडळी गुंतलेली आहेत ते मला दाखवा? गोव्यातील लोक यात सहभागी नाहीत. बेकायदेशीर धर्मांतर करणारे लोक गोव्याच्या बाहेरून येतात आणि प्रार्थना सभा आणि इतर उपक्रम करतात,” लोबो म्हणाले.

“ख्रिश्चन धर्मात प्रोटेस्टंट आणि इतर असे विविध पंथ आहेत. ते त्यांचा धर्म पुढे नेऊ शकतात पण धर्मांतर करू शकत नाहीत. ते लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतात. बेकायदेशीर धर्मांतरामुळे दोन धर्मांमध्ये मतभेद निर्माण होतात," लोबो पुढे म्हणाले.

गोव्यात असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर होत नसल्याने धर्मांतरविरोधी विधेयकाची गरज नाही. भारतीय दंड संहितेअंतर्गत विविध कायदे आहेत आणि या समस्येला आळा घालण्यासाठी ते पुरेसे आहेत, असे मत देखील लोबो यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT