मडगाव: कोलवा समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांशी भांडण करताना एकमेकांच्या झिंज्या उपटून आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप असलेल्या बेळगावच्या तीन महिलांना मडगाव न्यायालयाने काल शुक्रवारी दोषी ठरवून दंडाची शिक्षा ठोठावली. कस्तुरी ऊर्फ जान्हवी सबळे (२७), महादेवी ऊर्फ मधू पाटील (३०) आणि यल्लव्वा पाटील (५०) अशी त्यांची नावे आहेत.
न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, वरील तिन्ही संशयित आरोपींनी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर आपापसात कडाक्याचे भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. त्यांच्या या कृत्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली.
त्यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या महिला पोलिसांनाही या महिलांनी मारहाण केली होती. त्यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय दंडसंहितेच्या २०२३च्या १९४ (२) कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. सदर घटना सहा-सात महिन्यांपूर्वी घडली होती.
तिन्ही संशयित महिलांनी न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. त्यामुळे मडगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून प्रत्येकी एक हजार रुपयाचा दंड ठोठावला. दंडाची ही एकूण ३ हजार रुपयांची रक्कम आरोपींनी भरल्यास ती राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावी, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.