Coconut Price Hike  Dainik Gomantak
गोवा

Coconut Market Goa: खोबऱ्याच्या बाबतीत करावी लागणार काटकसर; नारळाचे दर इतक्या रुपयांनी वाढले

Coconut Price Hike in Goa: विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या नारळाचे दर १० ते १५ रुपयांनी महागले आहेत

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील लोकांचे ताट हे नारळाशिवाय अपूर्ण आहे. सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं जेवण आपल्याकडे प्रत्येक पदार्थात खोबरं हे आवर्जून टाकलं जातं. दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि कमी पुरवठा यामुळे राज्यात नारळाचे दर वाढलेत. पणजी विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या नारळाचे दर १० ते १५ रुपयांनी महागले आहेत.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात नारळ महागला. इथे नारळाच्या आकारानुसार त्याचे दर बदलतात, त्याप्रमाणे सध्या मोठा नारळ ४५ ते ५० आणि लहान आकाराचा नारळ २५ रुपयांना विकला जातोय, तर माध्यम आकाराचा नारळ हा ३५ ते ४० रुपयांच्या किमतीला उपलब्ध आहे.

नाताळ सणानंतर गोव्यात नारळाच्या किमतींनी गगनभरारी घेतलीये. सध्या राज्यात माकडाचा उपद्रव वाढलाय तसेच माडांच्या झाडांना रोगांनी ग्रासलंय त्यामुळे नारळाचं उत्पन्न काम कमी झालं आहे.

गोव्यात नारळ हा अतिशय महत्वाचा घटक असल्याने बाजारातील वाढत्या मागणीमुळे दर वाढले आहेत. शिवाय राज्यात सध्या नारळ पडणाऱ्या पाडेलीचा खर्चही वाढला असल्याने बाजारात हवा तास पुरवठा होत नाहीये. राज्यातील बाकी ठिकाणच्या तुलनेत पणजीत नारळाचे दर सर्वात अधिक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT