Sea Shore  Dainik Gomantak
गोवा

हवामान बदलामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे गोव्याची किनारपट्टी 20 टक्के खचली

मानवी हस्तक्षेपाचाही विपरीत परिणाम; उपाययोजनेची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: समुद्र तटावर असल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यासाठी एक धक्कादायक खबर! हवामान बदल आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे गोव्यातील 20 टक्के किनारपट्टी खचून गेली आहे. त्यामुळे त्याचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. (Climate change and human intervention have eroded Goa's coastline by 20 percent)

केंद्रीय भु विज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. 2014 - 15 च्या अहवालात ही झीज 17 टक्के होती मागच्या चार वर्षात त्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे देशातील इतर किनारपट्टीच्या झिजीच्या तुलनेत गोव्यातील ही (19.2 टक्के) झीज सर्वात कमी आहे.

गोव्यात (Goa)139 किमी किनारपट्टी असून समुद्र आणि नद्या यांचा एकत्रित परिणाम पाहिल्यास एकूण 26.8 टक्के तट खचून गेला असल्याचे या अहवालात म्हटले आहेत. जागतिक तापमानात झालेल्या वाढीमुळे दर्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने किनारपट्टी खचत असून अवैध बांधकामे आणि अन्य कारणासाठी किनारपट्टी वरील वाळूच्या टेकड्या कापल्या गेल्याने समुद्राचे (Sea) पाणी किनारपट्टीत आत शिरून किनारा ग्रस्त करू लागले असल्याचे सांगितले जाते.

सात वर्षांपूर्वी गोव्यातील किनारपट्टीचा अभ्यास केला असता 24 टक्के किनारपट्टी धोक्याच्या कक्षेत असल्याचे दिसून आले होते. तर आताच उपाय केले नाहीत तर आणखी 60 टक्के किनारपट्टी धोक्याच्या कक्षेत येऊ शकते असा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT