Goa: Online Education Dainik Gomantak
गोवा

Goa Boardचा निर्णय; नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू

गोवा शिक्षण खात्याचे ऑनलाईल शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक जारी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारने (Goa Government) येत्या 18 ऑक्टोबरपासून नववी ते बारावीचे (9th-12th) प्रत्यक्ष वर्ग (Offline) सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण खात्याने (Goa Education Board) त्यासंदर्भातचे परिपत्रक जारी काढले आहे. शाळा व्यवस्थापनांनी शाळेत असलेल्या सुविधा व स्थिती पाहून निर्णय घ्यावा. गरज पडल्यास ऑनलाईन व ऑफलाईन वर्गही घ्यावेत असे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

शाळा व्यवस्थापनांनी सुरुवातीच्या काळात ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने वर्ग घ्यावेत. शाळांचे कोविड मार्गदर्श सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गरज लागल्यास शाळा व्यवस्थापन स्वतःच्या मार्गदर्शक सूचना तयार करू शकतात. वर्गाचे वेळापत्रक शक्य होईल त्यानुसार तयार करण्यात यावे. सरकारच्या पुढील निर्देशापर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाऊ नयेत.

शाळेचे वर्ग सुरू होण्यापूर्वी वर्गांतील तसेच बाजूच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावेत. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT