सासष्टी: नाताळाच्या दिवसांत देशात काही ठिकाणी चर्च तसेच ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यावरील झालेल्या हल्ल्यावरून तसेच नाताळसाठी केलेल्या सुशोभीकरणाची मोडतोड केल्याने बाणावली येथील मच्छीमार फ्रांसिस्को (पेले) फर्नांडिस हे व्यथित झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान तसेच इतर नेत्यांना या घटना गंभीरपणे घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: दिल्लीतील चर्चमध्ये जाऊन आशीर्वाद घेतले. त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला. पण देशात काही ठिकाणी चर्च तसेच ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यावरील झालेल्या हल्ल्याच्या घटनांचे व्हिडिओ पाहून मन व्यथित झाले, असे पेले सांगतात.
भारत हा निधर्मी देश आहे. जगात भारताला मोठे स्थान आहे व अशा घटनांमुळे देशाची जगभर बदनामी होत आहे. हे आपल्याला मुळीच पसंत नाही. गोव्यात जेव्हा समुद्र किनाऱ्यावर पर्यटक येतात तेव्हा आम्ही त्यांना कुठले किंवा त्यांचा धर्म वगैरे विचारत नाहीत, त्यांना आमच्यापैकीच एक मानून त्यांचे स्वागत केले जाते व त्यांना आवश्यक मदत केली जाते.
हा आमचा धर्म आहे, असेही पेले सांगतात. आमचा तिरंगा झेंडा विविधता, धैर्य, शांती, विश्र्वास यांचे प्रतीक आहे. अशा वेळी देशात अशा घटना होताना आम्हाला खरोखरच वाईट वाटते, असेही पेले सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.