Babush Monserrate  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयांत आता ‘सीसीटीव्ही’

सहा महिन्यांत अंमलबजावणी: महसूलमंत्री मोन्सेरात यांचा निर्णय

दैनिक गोमन्तक

पणजी: मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालये ही सामान्य जनतेच्या समस्या सुटण्यासाठी महत्त्वाची ठरतात. या कार्यालयांत विविध कामांसाठी सामान्यांची नेहमी ये-जा असते. या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात शिस्त व वक्तशीरपणा यावा, सामान्यांची वेळेत कामे व्हावीत, यासाठी आता राज्यातील सर्व कार्यालयांत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून ही कार्यालये महसूल मंत्रालयाशी जोडली जातील, अशी घोषणा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज (गुरुवारी) केली. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महसूलमंत्री मोन्सेरात म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत महसूल खात्यात अामूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने कुळ मुंडकार प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तीन ते चार मामलेदार असायला हवेत. सध्या ही संख्या कमी आहे. तालुक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित मामलेदारांना या कामातच व्यस्त रहावे लागते. त्यामुळे कुळ मुंडकारांचे खटले पडून राहतात. याचा परिणाम या खटल्यांवर झाला असून, अनेक वर्षे हे खटले निकालात निघाले नाहीत. त्यामुळे निर्धारीत वेळेत हे खटले निकालात काढून संबंधितांना न्याय देण्यासाठी खात्यातर्फे तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT