Yuri Alemao |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa: गोव्यातील बेरोजगारीबाबत सरकार उदासीन; सरकारलाच कौशल्य शिक्षणाची गरज, आलेमाव यांची बोचरी टीका

बेरोजगारीला सरकार जबाबदार नाही असे वक्तव्य करुन मुख्यमंत्र्यांनी कौशल्य शिक्षणाच्या अभावावर बोट ठेवणे यातून सरकारची वैचारीक दिवाळखोरी पूढे आली आहे.

Pramod Yadav

'भाजप सरकारकडे रोजगार संधी निर्माण करण्याची कोणतीच योजना नाही. राज्यातील 70 टक्के पदवीधर बेरोजगार असल्याचे सीएमआयईच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. प्रशासन चालविणे सरकारला जमत नाही हे मागील दहा वर्षांत सिद्ध झाले आहे. रोजगाराभिमूख योजना चालीस लावण्यासाठी भाजप सरकारलाच कौशल्य शिक्षणाची गरज आहे,' अशी बोचरी टीका विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव (Yuri Alemao) यांनी केली आहे.

70 टक्के पदवीधरांना नोकरी नाही, हे सीएमआयईच्या सर्वेक्षणाने परत एकदा उघड झाल्याने मागिल अहवालावेळी सदर अहवालच चुकीचा असल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच अहवालावर आपली भूमिका बदलावी लागली. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निती आयोगानेही गोव्यातील बेरोजगारीचा आकडा जाहिर करुन भाजप सरकारला घरचा अहेर दिला हेही नसे थोडके असे युरी आलेमाव म्हणाले.

बेरोजगारीला सरकार जबाबदार नाही असे वक्तव्य करुन मुख्यमंत्र्यांनी कौशल्य शिक्षणाच्या अभावावर बोट ठेवणे यातून सरकारची वैचारीक दिवाळखोरी पूढे आली आहे. भाजप सरकारला नोकऱ्या विकत घेण्याचे कौशल्य युवकांमध्ये अभिप्रेत असावे हे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसते असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

70 टक्के पदवीधरांना नोकरी नाही, हे सीएमआयईच्या सर्वेक्षणाने परत एकदा उघड झाल्याने मागिल अहवालावेळी सदर अहवालच चुकीचा असल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच अहवालावर आपली भूमिका बदलावी लागली. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निती आयोगानेही गोव्यातील बेरोजगारीचा आकडा जाहिर करुन भाजप सरकारला घरचा अहेर दिला हेही नसे थोडके असे युरी आलेमाव म्हणाले.

कौशल्य शिक्षणाकडे बोट दाखवणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी (Pramod Sawant) सदर शिक्षणाचे महत्व युवकांना पटवून देण्यासाठी काय केले हे सांगावे. केवळ फाजील प्रसिद्धी घेण्यासाठी "रोजगार मेळावे" घेणाऱ्या भाजप सरकारकडे गोव्यातील बेरोजगारांची साधी आकडेवारी नाही हे मागच्या विधानसभा अधिवेशनांतील तारांकीत प्रश्नांच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्षाने 2022 च्या निवडणुकीत जारी केलेल्या जाहिरनाम्यात गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना जाहिर केली होती. डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) यांच्या "गोवा व्हिजन 2035" अहवालावर आधारीत कॉंग्रेस पक्षाच्या (Congress) जाहिरनाम्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभ्यास करुन तो चालीस लावल्यास गोव्याला भेडसावणारे केवळ बेरोजगारीच नव्हे तर इतर सर्व प्रश्न सुटतील असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT