Kadamba Transport
Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: गोव्यातील खासगी बस सेवेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री...

Akshay Nirmale

Kadamba Transport: गोव्यातील कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL) ला फायद्यात आणण्यासाठी तसेच गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोवा सरकारकडून पावले उचचली जात आहेत.

राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या सर्व खाजगी बसेस ताब्यात घेऊन ती कदंब परिवहन अंतर्गत चालविण्याचा मानस राज्य सरकारचा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. सध्या विविध मार्गांवर सुमारे 1,500 खासगी बसेस धावत आहेत.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील तोट्यात चालणारी महामंडळे ताब्यात घेणार असल्याचे म्हटले होते. त्यावर कदंबा महामंडळ तोट्यात असल्याचे विचारले असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कदंब महामंडळाला राज्य सरकारने महामंडळाला खासगी बसेस चालविण्याचे काम सुचविले आहे.

राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केटीसीएलच्या माध्यमातून गोव्यातील विविध मार्गांवर चालणाऱ्या खासगी बसेस कदंबकडे घेण्याचे सरकारचा विचार आहे. सरकारी महामंडळामार्फत टॅक्सी आणि काही दुचाकी सेवा जसे की पायलट ऑन बोर्ड घेण्याचाही आमचा मानस आहे. संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करणे हाच यामागील उद्देश आहे.

2012 मध्ये, मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने असाच एक प्रकल्प प्रस्तावित केला होता, तथापि, खाजगी बस ऑपरेटरच्या विरोधामुळे तो प्रत्यक्षात आला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT