BalRath Employee Strike Dainik Gomantak
गोवा

Balrath Employee Strike: बालरथ कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला मागे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आश्वासन

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

दैनिक गोमन्तक

बालरथ कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आला आहे. गेल्या विधानसभा अधिवेशानात या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगण्‍यात आले, परंतु तसे कोणतेही परिपत्रक अजून आलेले नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

आमच्या मागण्यांसाठी आम्ही विधानसभा अधिवेशनापासून म्हणजेच 27 मार्चपासून येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असा इशारा बालरथ कर्मचारी संघटनेच्या प्रमुख स्वाती केरकर यांनी दिला होता. मात्र माहितीनुसार, आता हा आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. याबाबतचे पत्रही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास आंदोलन करण्याचा निर्णय बालरथ कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT