Available Water Storage In Dams Of Goa Dainik Gomantak
गोवा

Dams In Goa: दोन धरणांत 10 टक्क्यांहून कमी पाणीसाठा; राज्याच्या धरणांतील पाणीसाठा जाणून घ्या

पाऊस लांबणीवर पडल्यास पाणी पुरेल का अशी चिंता सध्या नागरिकांना सतावत आहे.

Pramod Yadav

Available Water Storage In Dams Of Goa: पावासाळा सुरू होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशात गोव्यातील दोन धरणांतील पाणीसाठी दहा टक्क्यांच्या खाली आला आहे. मात्र, धरणांतील पाणीसाठी पावसाळ्यापर्यंत पुरेल असा विश्वास जलस्त्रोत खात्याने व्यक्त केला असून, चिंतेचे कारण नाही असे म्हटले आहे.

राज्यातील अंजुणे, पंचवाडी आणि साळावली धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. अंजुणे, पंचवाडी धरणातील पाणीसाठी तर 10 टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडल्यास पाणी पुरेल का अशी चिंता सध्या नागरिकांना सतावत आहे. मात्र, जलस्त्रोत खाते पाणी पुरेल असा दावा करत आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठी

अंजुणे 23.8 टक्के, पंचवाडी 4.5 टक्के, साळावली 23.80 टक्के, आमठाणे 51.8 टक्के, तिलारी 96 टक्के, गावणे 40.1 टक्के आणि चापोली 44.7 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. विविध भागात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होत आहे.

हरमल पंचायत क्षेत्रात वरचावाडा परिसरात मागच्या दोन-चार महिन्यांपासून पाण्याचा लपंडाव सुरू आहे. नळांना पाणी येत नाही. परंतु पाण्याची बिले नियमित येतात. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करतानाही मतभेद केला जात आहे.

यावर सरकारने योग्य तो तोडगा काढून दिवसाआड किमान दोन तास तरी आम्हाला पाणीपुरवठा करावा. चार दिवसांच्या आत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाणी विभाग पेडणे कार्यालयावर घागर मोर्चा नेण्याचा इशारा स्थानिक पंच रजनी इब्रामपूरकर यांनी ग्रामस्थांतर्फे दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT