Rice Price Increase Dainik Gomantak
गोवा

Rice Price Increase: 25 किलो तांदूळ पोत्यामागे 200 रुपयांची वाढ

Rice Price Increase: आणखी दरवाढीची भीती: विविध राज्यांत पावसाअभावी उत्पादनात घट

दैनिक गोमन्तक

Rice Price Increase: दुकानातून तांदूळ खरेदी करण्याशिवाय पर्याय नसणाऱ्या नागरिकांना आता 25 किलोच्या पोत्यामागे 200 ते 300 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

अगोदरच महागाईमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढत आहेत, परंतु सर्वसामान्यांसाठी भात अन्नपदार्थ महत्त्वाचा असल्याने त्यांना अधिक रक्कम देऊन तांदूळ खरेदी करावे लागणार आहे.

भात उत्पादन घेणाऱ्या राज्यांत अवकाळी पावसाने दिलेला दणका आणि काही ठिकाणी पिकाला योग्य वेळी न मिळालेले पाणी याचा परिणाम या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या तांदळाची मागणी वाढली आहे, परिणामी त्याच्या दरात वाढ झालेली दिसून येते. दरम्यान, उत्पादनात घट झाल्यास तांदळाचे दर वाढण्याची शक्यता घाऊक व्यापारी महेंद्र भगत यांनी व्यक्त केली आहे.

पोत्याचे दर

बासमती १५०० ते १७५०

कोलम १३०० ते १५००

रायभोग १२०० ते १४००

तूरडाळ महागली

अवर्षण-प्रवण भागात तूरडाळीच्या उत्पादनासाठी आवश्‍यक पाऊस न झाल्याने तूरडाळ उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात अद्याप हव्या त्या प्रमाणात तूरडाळीची आवक होत नसल्याने गोव्यात येणाऱ्या तूरडाळीचा दर किलोमागे १६० व १८० रुपये इतका आहे.

त्यात उंची व दुय्यम तसेच पॉलिश केलेली आणि विना पॉलिश असे तूरडाळीचे प्रकार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT