Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: स्वतःचे लपवून दुसऱ्याला दोष देण्यात भाजप सर्वात पुढे...

सुश्मिता देव: विकास पाहायचा असेल, तर बंगालला चला

दैनिक गोमन्तक

सांगे: आज नेटवर्कशिवाय काहीच हालचाली होत नाही, मग डिजिटल क्षेत्रात काय साध्य केले. केंद्र सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरले आहे. पश्चिम बंगाल सरकारने काय विकास केला ते पाहायचे असल्यास थेट बंगालला चला आणि मगच आम्हाला दोष द्या. स्वतःचा दोष लपविण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्यास भाजप (Goa BJP) सर्वात पुढे आहे. असा आरोप खासदार सुश्‍मिता देव यांनी केला. त्या सांगे येथील गुरुकुल सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Allegations against BJP by goa tmc)

त्या म्हणाल्या, राज्यातील सर्वांगीण विकास करण्यासाठी आता राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी गोव्यातील जनता तृणमूल काँग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षाला निवडून देणार नाही. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गोवा प्रभारी खासदार सुश्मिता देव पुढे म्हणाल्या, की सांगेसारख्या ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी तृणमूल काँग्रेस कटीबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया करण्यासाठी घोषणा केल्या जात असताना सांगेसारख्या भागात कोणत्याही भागात नेटवर्क नाही, मग तुमच्या सरकारने काय केले हे जनतेसमोर उपस्थित केले जाणार आहे.

यावेळी व्यासपीठावर तृणमूलच्या (Goa TMC) सांगे प्रभारी राखी प्रभुदेसाई, कांता गावडे, वाडे कुर्डीचे सरपंच डोमॅसीयो बार्रेटो, आनंद वेळीप, रिवणचे माजी सरपंच दामोदर वेळीप, माजी उपसरपंच आर्यकुमार जांबवलीकर उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी खासदार सुश्मिता देव यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सांगेचे आराद्य दैवत श्री पाईकदेवाचे दर्शन घेतले.

‘जलवाहिन्यांचा घोटाळा उघड करणार’

2012 साली निवडून आलेले सुभाष फळदेसाई आणि 2017 साली निवडून आलेले प्रसाद गावकर यांनी जनतेला पाणी पुरविण्यासाठी वेगवेगळ्या दोन जलवाहिन्या घातल्या, पण पाणी कोणीच दिले नाही. यात झालेला भ्रष्टाचार उघडा पाडण्यासाठी सखोल चौकशी तृणमूल काँग्रेसतर्फे (Goa Congress) करण्यात येणार असल्याचा इशारा सुश्मिता देव यांनी दिला.

‘संजीवनी’ बंद करण्यासाठीच केंद्रीय स्कूलचा विषय

साळावली धरणग्रस्थाचा विषय हाताळताना सुश्मिता देव म्हणाल्या, की काही धरणग्रस्तांना भूखंड दिले, पण पाणी दिले नाही, तर कित्येक धरणग्रस्तांना अजूनही भूखंड दिले नाही. धरणग्रस्तांचा रोजीरोटीचा प्रश्न म्हणजे संजीवनी साखर कारखाना. तोसुद्धा बंद पाडून राज्य सरकार अपयशी ठरले आहे. संजीवनीची जमीन केंद्रीय विद्यालयाला देण्यास आमचा विरोध नसून अन्य ठिकाणी केंद्रीय स्कूल सुरू करता आले असते, पण संजीवनी बंद पाडण्यासाठीच केंद्रीय स्कूल संजीवनी जमिनीत सुरू करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT