Flight Dainik Gomantak
गोवा

Goa To Indore Flight: खुशखबर! गोवा ते इंदूर विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून सुरू; दिल्लीतून आणखीन 3 विमाने येणार

Goa To Delhi Flight: दाबोळीवरून इंदूरसाठीचे विमान सकाळी १०.५५ ला निघून दुपारी १२.३५ ला पोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दुपारी १.१५ ला इंदूरहून विमान निघून ते दाबोळीवर दुपारी २.५५ वाजता पोचणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एअर इंडियाने दाबोळी ते इंदूर अशी नवी विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय दिल्लीतून दाबोळी विमानतळावर येण्यासाठी २६ ऑक्टोबरपासून दररोज आणखीन तीन विमानांची घोषणा केली आहे.

दाबोळीवरून इंदूरसाठीचे विमान सकाळी १०.५५ ला निघून दुपारी १२.३५ ला पोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दुपारी १.१५ ला इंदूरहून विमान निघून ते दाबोळीवर दुपारी २.५५ वाजता पोचणार आहे.

सध्या एअर इंडिया एक्सप्रेसकडून गोव्यातून आठवड्याला ४० उड्डाणे सुरू असून ती बंगळूर एअर इंडियाने दिल्ली ते गोवा (दाबोळी विमानतळ) या मार्गावर दररोज तीन नियमित उड्डाणांची घोषणा केली आहे. ही उड्डाणे पहाटे ५.१५, दुपारी १२.०० आणि रात्री ९.४५ वाजता दिल्लीहून सुटतील.

या नव्या वेळापत्रकामुळे दिल्ली आणि गोवा या दोन लोकप्रिय गंतव्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सोय होईल. दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या देशांतर्गत शहरांना तसेच दुबई या आंतरराष्ट्रीय ठिकाणी जोडतात. याशिवाय कंपनीकडून २७ देशांतर्गत आणि ५ आंतरराष्ट्रीय स्थळांशी एक-थांबा जोडणी देखील उपलब्ध आहे.

दिल्लीतून आणखीन ३ विमाने

एअर इंडियाने दिल्ली ते गोवा (दाबोळी विमानतळ) या मार्गावर दररोज तीन नियमित उड्डाणांची घोषणा केली आहे. ही उड्डाणे पहाटे ५.१५, दुपारी १२.०० आणि रात्री ९.४५ वाजता दिल्लीहून सुटतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT