काणकोण: आगोंद समुद्रकिनाऱ्यावरील ६७ पैकी १८ आस्थापनांचे टाळे काढण्यात आले. आगोंद किनाऱ्यावरील सागरी कासव संवर्धन भागातील ६७ पर्यटक रेस्टॉरंट व कुटिरांना चोवीस तासांत टाळे ठोकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काणकोण उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस यंत्रणेने आदेशाचे पालन करीत कारवाई केली होती, तर काही आस्थापन मालकांनी स्वतःहून आस्थापने बंद केली.
मात्र, यापैकी १८ आस्थापन मालकांनी आपल्याकडील सर्व खात्यांचे वैध परवाने असल्याची कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे सादर करून टाळे काढण्याची विनंती अर्ज केला होती. न्यायालयाच्या आदेशानुसार काणकोण उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर व आगोंद पंचायतीचे सचिव अमोल नाईक गावकर यांनी १८ आस्थापनांचे टाळे काढले.
ही आस्थापने खासगी मालकीच्या जमिनीत असली तरी त्यांचा विस्तार भरती रेषेच्या आत आहे. भरतीच्या वेळी भरतीचे पाणी पर्यटन आस्थापनात घुसण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.
आगोंद किनारा व तेथील समुद्री जीवसृष्टीची देखभाल व संवर्धन करण्याची जबाबदारी दक्षिण गोवा सागरी विभागाची आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्राखाली हा किनारा येत असल्याचे दक्षिण गोवा मरिन झोनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.