Sattari Rain Dainik Gomantak
गोवा

Sattari Rain : सत्तरी तालुक्यात बागायतदारांचे ५० लाखांचे नुकसान; चक्रीवादळाचा फटका

Sattari Rain : कृषी कार्यालयात नुकसानीचे दावे सादर करण्यास सुरुवात

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई, सत्तरी तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या चक्री वादळाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

केळी, नारळ, सुपारी, आंबा, निरफणस आदी झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड तसेच नासधूस झाली आहे. सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वाळपई विभागीय कृषी कार्यालयात नुकसान भरपाईचे दावे शेतकऱ्यांनी सादर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी ताबडतोब आपल्या नुकसान भरपाईचे दावे कृषी कार्यालयात सादर करावेत, जेणेकरून लवकरच या संदर्भाचा अहवाल कृषी खात्याला सादर करण्यासाठी शक्य होईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी मध्यरात्री सत्तरीला चक्रीवादळाचा फटका बसला. यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. याचा सर्वाधिक फटका बागायतींना बसला. तसेच वीज खात्याचेही मोठे नुकसान झाले आहे. म्हाऊस, ठाणे, नगरगाव, खोतोडा, सावर्डे, केरी, पिसुर्ले या पंचायत क्षेत्रात बागायतींची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

सावर्डे पंचायत क्षेत्रातील गोपाळ गावकर यांच्या बागायतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

केळी, सुपारीची झाडे पडली

केळी व सुपारीच्या झाड्यांची मोठ्या प्रमाणे हानी झाली आहे. केळी व सुपारीची झाडे अर्ध्यावरून मोडली आहेत. नगरगाव, कोपर्डे, ठाणे या भागात सर्वाधिक फटका बसलेला आहे.

चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे बागायतीमधील खासकरून केळी व सुपारीच्या झाडाचे नुकसान झाले आहे. तसेच नारळाच्या झाडांचीही नुकसान झाले आहे.

- विठ्ठल सावंत, कोपार्डे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT