Vijayanagara Throne Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

तालीकोटाच्या युद्धानंतर दरोडेखोर, डाकूंच्या टोळ्यांनी लूटमार केली; दुर्मिळ रत्नांनी सजवलेले विजयनगर साम्राज्याचे 'सिंहासन'

Vijayanagara Empire: पोर्तुगीज प्रवासी डुआर्टे बार्बोसने १५०१ मध्ये विजयनगरला भेट दिली होती, ते म्हणतात की राजाकडे नऊशेहून अधिक भव्य आणि सुंदर हत्ती होते जे युद्ध आणि राज्य दोन्हीसाठी वापरले जात होते.

Sameer Panditrao

सर्वेश बोरकर

दक्षिणेतील सर्वांत शक्तिशाली साम्राज्य म्हणून, विजयनगरकडे चौदाव्या ते सोळाव्या शतकापर्यंत पाहिले जाते. विजयनगरातील मंदिरावरच्या कोरीवकामांवर एक नजर टाकली तर विजयनगरचे वैभव काय होते, याची कल्पना येते. हंपी हा तर त्या वास्तुकलेच्या वैभवाचा जिवंत पुरावा.

विजयनगरातील घोड्यांच्या व्यापारावर पहिल्यांदा अरब व्यापाऱ्यांनी आणि नंतर पोर्तुगिजांनी आपली मक्तेदारी स्थापित केली. घोड्यांचा व्यापार व पुरवठा नियमित व्हावा याची खबरदारी म्हणून आणि प्रवासादरम्यान झालेल्या कोणत्याही प्राण्यांच्या मृत्यूसाठी विजयनगरच्या राजांकडून पैसे मोजले जात असत, अशी माहिती सापडते. विजयनगरातील हंपीमध्ये संपूर्ण ‘विजयाविठ्ठल’ हा बाजार केवळ घोड्यांच्या व्यापारासाठीच होता.

पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस महान सम्राट कृष्णदेवरायांच्या महानवमी उत्सवाचे दरबारात भेटीवेळी तपशीलवार वर्णन करतो. ज्यामध्ये तो म्हणतो, ‘मखमली आणि सोन्याच्या कपड्यांनी मढवलेले युद्ध हत्तींची एक तुकडी, ज्यांच्यावर अनेक रंगांच्या झालर आणि समृद्ध कपडे आणि घंटा आहेत जेणेकरून पृथ्वी गुंजेल आणि त्यांच्या डोक्यावर राक्षस आणि इतर प्रकारच्या महान प्राण्यांचे चेहरे रंगवलेले आहेत. प्रत्येकाच्या मागे तीन किंवा चार पुरुष आहेत, त्यांनी अंगरखे घातलेले आहेत आणि ढाल आणि भाला घेतलेले आहेत’.

पोर्तुगीज प्रवासी डुआर्टे बार्बोसने १५०१ मध्ये विजयनगरला भेट दिली होती, ते म्हणतात की राजाकडे नऊशेहून अधिक भव्य आणि सुंदर हत्ती होते जे युद्ध आणि राज्य दोन्हीसाठी वापरले जात होते. सोळाव्या शतकातील पोर्तुगीज प्रवासी फर्नाव नुनिज विजयनगरच्या युद्धाचे वर्णन करतो. हंपीमध्ये आढळणाऱ्या विस्तीर्ण अवशेषांमध्ये व असंख्य कोरीवकामांमध्ये व्यापाराचे पुरावे स्पष्टपणे आढळतात.

कोरीवकामांमध्ये काम करणाऱ्या हत्तीच्या विविध शिल्पामध्ये हत्ती पालनाच्या व दैनंदिन दृश्यांचा समावेश आहे. महानवमी दिब्बामध्ये वाघांची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्तींचे कोरीवकाम तसेच हत्तींचा वापर शिकारीसाठी स्वार म्हणून नव्हे तर शिकार मारण्यासाठी केला जात असे. हत्तींच्या लढाया हा आणखी एक शाही मनोरंजन खेळ आणि हत्ती विरुद्ध हत्ती किंवा वाघ, सिंह, बैल आणि अस्वल यांसारख्या इतर कोरीवकाम हंपीच्या भिंतींवर आढळते. हजारा राम मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कूच करणाऱ्या हत्तींच्या तुकडीसह महानवमी उत्सव कोरलेला आहे.

पाणीपुरवठ्यासाठी हंपीमध्ये भूमिगत कालव्यांचे एक मोठे जाळे पाहायला मिळते. या कालव्यांमधून मोठ्या संख्येने मंदिरे, पुष्करणी (पायऱ्या असलेली पाण्याची टाकी), राणीच्या स्नानगृहासारखी स्नानगृहे आणि गरम दिवसात थंडावा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलमंडपांना पाणीपुरवठा केला जात असावा. या कालव्यांना पाणी थोड्या उंचावर असलेल्या कमलापूर तलावातून पुरवले जात असे.

हे सगळं विजयनगर साम्राज्याचे वैभव एका क्षणात उद्ध्वस्त झाले.१५६५मध्ये तालीकोटाच्या लढाईनंतर, मुस्लिम सैन्याने विजयनगर किंवा हंपीवर हल्ला केला आणि शहर उद्ध्वस्त केले, इमारती जाळल्या आणि लोकांची आणि त्यांच्या राहत्या घरांत हत्या व लूटमार केली. मुस्लिम आक्रमकांनी शेकडो टन मौल्यवान वस्तू, पुस्तके, आणि अगदी बायका, पोरांना व लोकांना गुलाम म्हणून परत नेले गेले.

तथापि, विजयनगरच्या अफाट खजिन्याचा काही भाग तिरुमलारायाने पेनुगोंडा येथे नेला आणि त्याला विजयनगर राजवंशाची राजधानी बनवले. असाच एक खजिना म्हणजे विजयनगरचे भव्य सिंहासन ज्यावर कृष्णदेवराय व इतर राजे बसले होते. या सिंहासनाचे वर्णन पोर्तुगीज प्रवाशांनी आणि विजयनगरच्या वृत्तांतातही भारतीय लेखकांनी केले आहे, ज्यात विजयनगरला आलेल्या आदिल शाहचा दूतही समाविष्ट आहे. पोर्तुगीज आणि आदिल शाह राजदूत राजाच्या दरबाराबद्दल बोलतात.

जर सम्राट कृष्णदेवराय यांनी नंतरच्या काळात राजाच्या दरबाराचे अध्यक्षपद भूषवले तर विजयनगर सिंहासन हे त्या काळातील एका महान सम्राटासाठी योग्य स्थान होते. ते सिंहासन सोने व इतर दुर्मीळ रत्नांनी सजवलेले होते. ते विजयनगरमध्ये दरबारात एका उंच व्यासपीठावर ठेवलेले होते जिथे सम्राट दरबार भरवत असे.

तालीकोटाच्या युद्धानंतर लगेचच, विजयनगरच्या सैन्याने शहराला त्यांच्या नशिबावर सोडून पळ काढला. दरोडेखोर आणि डाकूंच्या टोळ्यांनी त्यांना जे काही घेता आले ते सर्व लुटून नेले. थोड्या वेळाने, मुस्लिम आक्रमक विजयनगरमध्ये आले आणि त्यांना जे काही हाताशी लागले ते घेऊन गेले. तरीही, काही मौल्यवान गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटल्या आणि त्यापैकीच एक विजयनगरचे सिंहासन. काही इतिहासकारांना असे वाटते की, ते सिंहासन विजयनगरमध्येच आहे, जरी ते दुसऱ्या स्वरूपात असले तरी.

१५६५मध्ये जेव्हा विजयनगर राजघराणे विजयनगरमधून पळून गेले तेव्हा त्यांनी सिंहासन सुरक्षिततेसाठी विरूपाक्ष मंदिरास भेट म्हणून दिले गेले असावे अशी एक आख्यायिका आहे. एक दिवस परत येण्याची आशा बाळगून त्यांनी हे सिंहासन विरूपाक्ष मंदिरात लपवून ठेवले असावे असे काही इतिहासकारांचे मत आहे. पण विजयनगर परत मिळविण्याचे त्यांचे स्वप्न, स्वप्नच राहिले आणि तालीकोटाच्या युद्धानंतर शतकानुशतके विजयनगर एक खंडहर बनत गेले.

आंध्र प्रदेशातील इतिहासकार, डॉ. के. कृष्णाराव त्यांनी असे मत व्यक्त केले आहे की सिंहासन हंपीमध्ये आहे. डॉ. राव यांनी विरूपाक्ष मंदिरातील सिंहासन पाहिले असल्याचा दावा केला आहे. डॉ. राव आणि इतर इतिहासकार म्हणतात की, सम्राट कृष्णदेवराय आणि इतर काहींचा राज्याभिषेक याच विरूपाक्ष मंदिरात झाला होता.

कृष्णदेवरायांचा राज्याभिषेक ७ ऑगस्ट १५०९ रोजी झाला. पण आश्चर्य म्हणजे विरूपाक्ष मंदिरात सध्या असलेले सिंहासन शुद्ध चांदीचे आहे आणि त्यावर अनेक कोरीवकाम केलेले आहे. आपल्याला फक्त एवढेच माहिती आहे की नंतरच्या काळात विजयनगरची दुसरी राजधानी असलेल्या अनेगुंडी येथे पण सिंहासन होते. असा अंदाज लावता येतो की विजयनगर सम्राटांनी अनेक सिंहासने वापरली आणि म्हैसूर सिंहासन त्यापैकी एक होते. पण बाकीच्यांचे काय झाले, हे अजूनही एक गूढ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT