Water Intoxication|Ashley Summers Daini Gomantak
ग्लोबल

Water Intoxication: अति पाणी पिणाऱ्यांनो सावध व्हा! 20 मिनिटांत 2 लिटर पाणी प्यायल्याने महिलेने गमावला जीव

Water Intoxication: तरीही कमी कालावधीत जास्त पाणी पिण्याची सवय अनेकांना घतक ठरू शकते. कारण मूत्रपिंडे प्रत्येक तासाला जास्तीत जास्त एक लिटर पाणी साफ करू शकतात.

Ashutosh Masgaunde

American Woman Lost Life After Drinking 2 Liters of Water Within 20 Minutes:

अमेरिका सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 मिनिटांच्या कालावधीत सुमारे दोन लिटर पाणी प्यायल्याने दोन चिमुकल्यांची आई असलेल्या एका 35 वर्षीय अमेरिकन महिलेचा मृत्यू झाला आहे. अॅशले समर असे महिलेचे नाव आहे.

अॅशले समरच्या मृत्यूनंतरही तिचे हृदय, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि तिच्या काही लांब हाडांच्या ऊतींचे दान करण्यात आले, ज्यामुळे आणखी पाच जीव वाचले, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

ही महिला कमी कालावधीत अति पाणी प्यायल्याने तिला पाण्याची विषबाधा झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कमी कालावधीत जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.

हे असे प्रकार तुलनेने दुर्मिळ आहे. तरीही कमी कालावधीत जास्त पाणी पिण्याची सवय अनेकांना घतक ठरू शकते. कारण मूत्रपिंडे प्रत्येक तासाला जास्तीत जास्त एक लिटर पाणी साफ करू शकतात.
डॉ. आलोक हरवानी, अर्नेट हॉस्पिटल

अॅशले समर्स (Ashley Summers) नावाची महिला तिच्या पती आणि दोन लहान मुलींसोबत जुलैच्या वीकेंडला इंडियाना येथील लेक फ्रीमन येथे ट्रीपसाठी गेले होते.

तेव्हा तेथील उष्णतेमुळे तिला खूप तहान लागू लागली. अशात या महिलेने 20 मिनिटांत चार बाटल्या पाणी प्यायले. ही प्रत्येक बाटली अर्था लिटरची होती.

ट्रीपच्या शेवटच्या दिवशी या महिलेने डोके दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिला वाटले की ती आता पाणी पिऊ शकणार नाही आणि जमीनीवर कोसळली.

समर्स बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने आययू हेल्थ अर्नेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, ती पुन्हा शुद्धीवर आलीच नाही, पाण्यातील विषबाधेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

जेव्हा एखादी व्यक्ती कमी कालावधीत जास्त पाणी पिते तेव्हा मूत्रपिंडात (Kidneys) अति प्रमाणात पाणी साठते त्यातून पाण्याची विषबाधा (Water Intoxication) होते. स्नायू ताणने, मळमळ आणि डोकेदुखी ही या दुर्मिळ स्थितीची लक्षणे आहेत.

IU हेल्थ अर्नेट हॉस्पिटलचे टॉक्सिकोलॉजिस्ट डॉ. ब्लेक फ्रोबर्ग यांच्या मते, तीव्र उन्हाळ्यात किंवा उन्हात काम करत असल्यास पाण्याची विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते.

त्यांनी सुचवले की लोकांनी पाण्याबरोबर अधून मधून इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम आणि सोडियम असलेले द्रव प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT