Arrested  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: '700 भारतीय PAK च्या तुरुंगात बंद, काही वेडे झाले...', भारतात परतलेल्या कैद्याचा खुलासा

Pakistan News: पाकिस्तान सरकारने मंगळवारी अटारी-वाघा सीमेवरुन दोन भारतीय कैद्यांची सुटका करुन त्यांना भारतात परत पाठवले.

Manish Jadhav

Indian Prisoners In Pakistani Jails: पाकिस्तान सरकारने मंगळवारी अटारी-वाघा सीमेवरुन दोन भारतीय कैद्यांची सुटका करुन त्यांना भारतात परत पाठवले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एका कैद्याने सांगितले की, सुमारे 700 भारतीय पाकिस्तानमध्ये त्यांची शिक्षा भोगत आहेत.

प्रोटोकॉल अधिकारी अरुण पाल यांच्या म्हणण्यानुसार, राजू पाच वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेला होता. तर दुसरा कैदी गेम्ब्रा राम सुमारे अडीच वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) तुरुंगात होता.

एका मुलीचा पाठलाग करत पाकिस्तानात पोहोचला होता

एका मुलीचा पाठलाग करत पाकिस्तानची सीमा ओलांडली होती, असे गेम्ब्रा रामने सांगितले. तो म्हणाला की, 'मी एका मुलीचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडली. तिथे पोहोचल्यावर सहा महिने मला खूप छळले. सहा महिन्यांनंतर, मला दुसर्‍या तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे मी 21 महिने घालवले.'

'मी त्याची प्रकृती सांगू शकत नाही'

गेम्ब्रा राम पुढे म्हणाला की, 'मी ज्या तुरुंगातून आलो आहे, त्या तुरुंगात आणखी 700 भारतीय आहेत. ते वेडे झाले आहेत, खूप रडत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल मी सांगू शकत नाही.'

असे सरकारला आवाहन

गेम्ब्रा रामने सरकारला (Government) विनंती केली की, सर्व भारतीयांना लवकरात लवकर बाहेर काढावे, कारण अनेक भारतीय कैदी तुरुंगात वेडे झाले आहेत. तिथे त्यांची अवस्था खूप दयनीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT