Pakistan PM Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानचे PM इम्रान खान यांनी मुस्लिम देशांबाबत व्यक्त केली नाराजी

इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (OIC) 48 व्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या (सीएफएम) उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते.

दैनिक गोमन्तक

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी इस्लामाबाद येथील संसद भवनात इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (OIC) 48 व्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या (सीएफएम) उद्घाटन सत्रामध्ये बोलताना पुन्हा एकदा काश्मीर बद्दल संताप व्यक्त केला. तसेच मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली. (Pakistan PM Imran Khan expresses displeasure over Muslim countries)

इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी मुस्लिम देशांच्या संघटनेला सांगितले की, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा (अनुच्छेद 370) रद्द केल्याने हे दिसून येते की, आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू शकलो नाही.

मुस्लीम जगताने एकत्र राहण्याची आणि समान अजेंड्यावर एक गट म्हणून राहण्याची नितांत गरज असल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की जगभरात मुस्लिमांची हत्या केली जात आहे आणि दहशतवादाशी चुकीचा संबंध जोडला जात आहे. इम्रान खान यांच्याबरोबरच सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनीही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या (Kashmir) मुद्द्यावर बोलताना खान म्हणाले की, त्या भागात दिवसाढवळ्या लूट केली जात आहे तर मुस्लिम जग हे मूकेपणे पाहत आहे. ते पुढे म्हणाले, “भारत जम्मू आणि काश्मीर राज्याची लोकसंख्या मुस्लिम बहुसंख्य राज्यातून मुस्लिम अल्पसंख्याक राज्यात बदलत आहे. याचा भारताला (India) काही फरक पडत नाही, कारण मुस्लिम जग त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी काहीही करत नाही. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनीही ओआयसी देशांना संबोधित करताना पॅलेस्टाईन आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरचा संदर्भ देत त्यांनी या प्रकरणावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT