Nepal's politics will get a new direction today Dainik Gomantak
ग्लोबल

नेपाळच्या राजकारणाला आज मिळणार नवीन दिशा

पंतप्रधान के.पी. शर्मा (Nepal Prime minister) ओली यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष भंडारी यांनी २२ मे रोजी पाच महिन्यांत दुसऱ्यांदा संसदेचे खालचे सभागृह भंग केले होते(Nepal)

दैनिक गोमन्तक

संसद विघटनविरोधात राष्ट्रपती विद्या भंडारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील नेपाळचे(Nepal)सर्वोच्च न्यायालय आज आपला निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. आज जर कोर्टाचा हा निर्णय आला तर या निर्णयामुळे देशातील अनेक महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय कोंडी संपू शकेल.

पंतप्रधान के.पी. शर्मा (Nepal Prime minister) ओली यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष भंडारी यांनी २२ मे रोजी पाच महिन्यांत दुसऱ्यांदा संसदेचे खालचे सभागृह भंग केले होते. आणि त्यानंतर १२ आणि १९ नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या होत्या. याच निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 30 याचिका दाखल झाल्या आहेत. 275 सदस्यांच्या सभागृहात विश्वास मत गमावल्यानंतर ओली सध्या अल्पसंख्याक सरकारचे नेतृत्व करीत आहेत.

विरोधी पक्षांच्या आघाडीच्या वतीनेही याचिका दाखल करण्यात आली असून, संसदेचे खालचे सभागृह पुनर्संचयित करण्याची आणि नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. त्यावर 146 खासदारांच्या स्वाक्षर्‍याही आहेत.

याचिकाकर्त्यांपैकी एक ज्येष्ठ वकील दिनेश त्रिपाठी म्हणाले की, सोमवारी कोर्टाचा निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्रिपाठी म्हणाले की, निकाल देताना न्यायालय घटनेतील तरतुदी व भूतपूर्व उदाहरणे विचारात घेईल आणि हा ऐतिहासिक निर्णय असेल. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात आगामी मध्यावधी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले होते, त्याअंतर्गत 15 जुलैपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT