S. Jaishankar Dainik Gomantak
ग्लोबल

चीन भारत सीमावाद;आम्हाला सोडवायचा आहे परंतु ...

भारत-चीन सीमा वादावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मोठे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

गेले काही वर्षे भारत चीन सीमावाद सुरु असून अनेक मुद्यांवरुन दोन्ही राष्ट्रातील परराष्ट्र संबंध ताणले गेले आहेत. या मुद्याशी भारतिय नागरिकांच्या ही भावना जोडल्या गेल्या असल्याने हा मुद्दा अधिकच गुंतागुतीचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

जयशंकर म्हणाले की, आम्हाला सीमा विवाद सोडवायचा आहे. परंतु आमच्या दाव्यानुसार न्याय्य आणि न्याय्य अशा अटींवर आम्हाला हे सोडवायचे आहे. त्यामूळे एखादे राष्ट्र आम्हाला त्यांच्या अटींसाठी तडजोड करण्यास सांगत असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही असे ही ते म्हणाले.

पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, ज्या अटींवर कोणताही देश म्हणतो की, हा त्याचा उपाय आहे आणि तो आम्हाला स्वीकारावा लागेल. अशा अटींवर आम्हाला तो सोडवायचा नाही. असे होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. सीमा विवाद परस्पर संमतीने आणि आमच्या दाव्याला न्याय दिला तरच सोडवला जाऊ शकतो. त्यामूळे भारत हा मुद्दा सोडवण्यास तयार असला तरी आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याचं यावरुन स्पष्ट झाले आहे.

हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे ज्यामध्ये जमिनीचा वादही आहे.1958 पासून आमचा चीनशी सीमावाद आहे. आपण 60 वर्षांपासून बोलत आहोत. आता आपल्याला काय व्यवस्थापित करायचे आहे, त्यासाठी सर्वप्रथम प्रत्यक्ष सीमेवर छेडछाड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, परंतु दुर्दैवाने चीनला ही स्थिती कायम ठेवायची नाही.

तो एकतर्फी वागत राहतो. साहजिकच आम्हाला हे मान्य नाही. आणि यामुळेच आपले सैन्य आपल्या भूमीच्या रक्षणासाठी तैनात आहे. दोन वर्षांपूर्वी काय घडले ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. असे असूनही, आम्हाला तोडगा हवा आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT