Chabahar Port
Chabahar Port Dainik Gomantak
ग्लोबल

इराणचे चाबहार बंदर भारतासाठी महत्त्वाचे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Manish Jadhav

इराणचे (Iran) चाबहार बंदर (Chabahar Port) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खरे तर अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान राजवट स्थापन झाल्यानंतर चाबहार बंदराच्या कामावर परिणाम झाला होता. तालिबानने आश्वासन दिल्यानंतर येथील वाहतूक पुन्हा वाढू लागली आहे. तालिबानने म्हटले आहे की, आम्हाला भारतासोबत राजनैतिक आणि व्यापारी संबंध हवे आहेत. त्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक व्यापार सुलभ करण्यासाठी आम्ही बंदराचे समर्थन करतो. भारताने हे बंदर तयार केले आहे. या बंदराचे महत्त्व काय? भारतासाठी ते कितपत उपयुक्त आहे? चाबहार आणि त्याचा चीनी फॅक्टर काय आहे? या संपूर्ण प्रकरणावर जाणकारांचे मत काय आहे ते जाणून घेऊया.

चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत उपयुक्त

1- प्रा. हर्ष व्ही पंत म्हणतात की, चाबहार बंदर हे सामरिक दृष्टिकोनातूनही भारतासाठी खूप उपयुक्त आहे. ग्वादरच्या तुलनेत भारताचे मोक्याचे बंदर म्हणून याकडे पाहिले जाते. ग्वादर चीनने बेल्ट अँड रोड प्रकल्पांतर्गत (Belt and road projects) बांधण्यात आले आहे. ग्वादर बंदराचे अंतर चाबहारपासून रस्त्याने फक्त 400 किमी आहे, तर समुद्रापासून ते फक्त 100 किमी आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्वादर बंदरात चीनची उपस्थिती भारतासमोर मोठी समस्या निर्माण करु शकते. त्यामुळे इराणचे चाबहार बंदर भारताच्या आर्थिक आणि सामरिक दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे. दुसरे म्हणजे अरबी समुद्रात चीनला आव्हान देण्यासाठी हे बंदर भारतासाठी महत्त्वाचे आहे.

2- चीन इराणवर बारीक नजर ठेवत असताना भारताची ही चिंता वाढत असल्याचे ते म्हणाले. अमेरिका आणि इराणसोबतच्या तणावादरम्यान चीनही तेहरानच्या अगदी जवळ आला आहे. अमेरिका इराणमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. हे पाहता भारताला आपली रणनीती बदलावी लागेल. ड्रॅगनच्या रणणीतीचा सामना करण्यासाठी भारताला सतर्क राहावे लागणार आहे. या दृष्टीने चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

3- प्रा. पंत म्हणाले की, चाबाहार आर्थिक दृष्टिकोनातूनही भारतासाठी खूप उपयुक्त आहे. याद्वारे भारताला अफगाणिस्तानमध्ये प्रवेश वाढवण्यास मदत होणार आहे. भारत पाकिस्तानमधून न जाता चाबहार बंदरातून थेट अफगाणिस्तानात पोहोचता येणार आहे. यामुळे अफगाणिस्तानात सुरु असलेल्या भारतीय कामासाठी पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी होईल. तालिबान राजवटीपूर्वी भारत चाबहार बंदरातूनच गहू आणि इतर साहित्य अफगाणिस्तानात पाठवत होता. अफगाणिस्तानातूनही निर्यात याच मार्गाने होते.

4- ते पुढे म्हणाले की, जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध सौहार्दपूर्ण होतील, असा विश्वास होता. ते इराणमार्गे मध्य आशियापर्यंत पोहोचू शकेल, अशी भारताला आशा होती. ट्रम्प सरकारच्या काळात भारताला चाबहार बंदरातून अफगाणिस्तानात माल पाठवण्याची परवानगी होती. इराण आपल्यावरील निर्बंध उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताने आपले लक्ष चाबहार बंदरावर केंद्रित केले आहे.

बंदर विकसित करण्यासोबतच भारत चाबहार ते अफगाणिस्तानपर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्यासही उत्सुक आहे. 2016 मध्ये इराण आणि भारताने या प्रकल्पावर स्वाक्षरी केली होती. मात्र, रेल्वे योजनेचे काम रखडले आहे. इराणला आता अफगाणिस्तानात रेल्वेमार्ग बांधायचा आहे. हे भारताच्या हिताचे असेल. यामुळेच भारत चाबहार बंदरात रस दाखवत आहे.

पंतप्रधानांच्या इराण भेटीचा उद्देश

मे 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) इराणला गेले होते. 15 वर्षात भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच इराण भेट होती. या भेटीत मोदींनी भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील त्रिपक्षीय संबंधांसाठी इराणमधील चाबहार बंदर विकसित आणि चालवण्यासाठी $550 दशलक्ष गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. भारताने ही योजना विकसित करावी अशी इराणची पूर्वीची इच्छा होती. प्रा. पंत म्हणाले की, भारताने मध्यंतरी हा निर्णय घेण्यास काहीशी कुचराई केली होती, त्यामुळे हा प्रकल्पही लांबणीवर पडला होता. मात्र, आता हा प्रकल्प आपल्या हातून निसटू नये, असे केंद्र सरकारला वाटत आहे. चीनचा इराणमधील वाढता रस पाहता भारत आता सक्रिय झाला आहे.

भारत-इराण यांच्यात 2018 मध्ये एक करार झाला

इराण-भारताने 2018 साली चाबहार बंदर विकसित करण्याचा करार केला होता. हे बंदर थेट ओमानच्या आखाताला जोडते. हे बंदर भारत आणि अफगाणिस्तानला व्यापारासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देते. या बंदरासाठी केलेल्या करारांबाबत अमेरिकेने भारताला काही निर्बंधांतून सूट दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT