India's Representative Ruchira Kamboj Dainik Gomantak
ग्लोबल

''महिला सशक्तीकरणातूनच भारत 2047 पर्यंत विकसित देश बनेल'', UN मध्ये भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या!

Women Empowerment: महिला सक्षमीकरणाबाबत भारतात अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ही माहिती दिली.

Manish Jadhav

India on Women Empowerment:

महिला सक्षमीकरणाबाबत भारतात अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ही माहिती दिली. समाजात लैंगिक न्याय कसा सुनिश्चित करता येईल हे त्यांनी स्पष्ट केले. यूएनमधील भारतीय मिशनने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये महिलांच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी भारताचे प्रतिनिधी कंबोज म्हणाल्या की, भारत 2047 पर्यंत विकसित देश बनेल आणि महिला सक्षमीकरणातून हे शक्य होईल.

UN मध्ये भारतीय प्रतिनिधी कंबोज यांनी आणखी काय सांगितले?

कार्यक्रमादरम्यान, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या (India) स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, महिलांसाठी एक बहुआयामी धोरण तयार केले जात आहे. यामध्ये आरोग्य, सुरक्षा आणि रोजगार या क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्याचे काम केले जात आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, हा उपक्रम लैंगिक न्याय, समानता आणि भारताच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग सुनिश्चित करत आहे. युनायटेड नेशन्समध्ये महिलांच्या स्थितीबाबत 68 वी वार्षिक बैठक 11 मार्चपासून सुरु झाली, जी 22 मार्चपर्यंत चालणार आहे. या बैठकीदरम्यान भारतीय मिशनने भारतात महिला सक्षमीकरणासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती दिली.

जी-20 मध्ये पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले होते

G20 च्या अध्यक्षपदी असतानाही PM मोदी (PM Modi) म्हणाले होते की, 'महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरु होत आहे.' अलीकडेच भारताने संयुक्त राष्ट्रात धार्मिक दहशतवादाचा तीव्र निषेध केला होता. भारताच्या संयुक्त प्रतिनिधी रुचिरा कंबोज (India's Representative Ruchira Kamboj) म्हणाल्या की, ''धर्मविरोधी असो, ख्रिश्चनविरोधी असो किंवा इस्लामविरोधी भावना असो, भारत सर्वांच्या विरोधात आहे.''

कंबोज यांनी मंदिर आणि गुरुद्वारांवरील हल्ल्यांवरही भाष्य केले

त्या पुढे म्हणाल्या की, हिंदू, शीख आणि बौद्धविरोधी भावना वाढल्या असून अनेक ठिकाणी मठ, मंदिरे (Temple) आणि गुरुद्वारांवर हल्ले होत आहेत. इस्लामोफोबियाला तोंड देण्यासाठी उपाययोजनांवरील प्रस्तावावरील चर्चेदरम्यान कंबोज यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, 'भारत सर्व धर्मांचा आदर करतो आणि संपूर्ण जगाकडे कुटुंबाच्या दृष्टीकोनातून पाहतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT