India-Pakistan
India-Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

India-Pakistan मधील व्यापार पुन्हा सुरु होणार! पाक मधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली 'ही' माहिती

Manish Jadhav

India-Pakistan: सध्या भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार बंद आहे. पाकिस्ताननेच भारताशी व्यापारी संबंध तोडले. याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत.

तो कटोरा घेऊन जगभर भीक मागत आहे. जो माल तो भारतातून स्वस्तात विकत घेऊ शकतो, तो परदेशातून जबरदस्तीने महागड्या दराने आयात करतो.

भारताने अफगाणिस्तानसह अनेक आखाती देशांना गहू आणि धान्य दिले आहे. मात्र पाकिस्तानात पिठाचा तुटवडा असल्याने उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील भारतीय उपउच्चायुक्त सुरेश कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताच्या बाजूने पाकिस्तानसोबतचे व्यावसायिक संबंध कधीही संपुष्टात आलेले नाहीत.

दरम्यान, व्यावसायिक संबंध सामान्य करण्याच्या दिशेने आम्हाला पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले. पाकिस्तानमधील (Pakistan) भारताचे उपउच्चायुक्त सुरेश कुमार शुक्रवारी लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला (LCCI) संबोधित करत होते.

'आम्ही आमचा भूगोल बदलू शकत नाही'

पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्रानुसार, भारतीय उच्चायुक्त म्हणाले की, 'भारताला नेहमीच पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत, कारण आम्ही आमचा भूगोल बदलू शकत नाही.'

ते पुढे म्हणाले की, आम्हाला पाकिस्तानसोबत सामान्य संबंधांकडे जायचे आहे. आम्ही पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवला नाही. पाकिस्ताननेच व्यापारी संबंध बंद केले आहेत.

कुमार म्हणाले, "आम्ही आमच्या समस्या आणि परिस्थिती कशा बदलू शकतो हे पाहणे आवश्यक आहे."

कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तानने व्यापारी संबंध संपवले

वास्तविक, भारताने (India) 2019 मध्ये जम्मू-काश्मीरबाबत कलम 370 रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध संपवले.

तसेच इस्लामाबादमधील उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. ते म्हणाले की, 'भारताला पाकिस्तानशी सामान्य शेजारी संबंध हवे आहेत.

पाकिस्तानने दहशतवाद संपवावा आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊ नये, यावर भारताकडून भर देण्यात आला आहे. मात्र याची खात्री करणे हे पाकिस्तानचे काम आहे.'

कोरोनामुळे व्हिसाच्या संख्येत घट झाली आहे

आकडेवारी दर्शवते की, 2020-21 मध्ये पाकिस्तानसोबतचा व्यापार USD 329.26 दशलक्ष आणि 2019-20 मध्ये USD 830.58 दशलक्ष होता.

त्यांनी मान्य केले की, कोविड-19 महामारीच्या काळात भारतीय दूतावासाने पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेल्या व्हिसाच्या संख्येत घट झाली आहे.

तरीही, त्यांनी आग्रह धरला की, आता संख्या वाढली आहे, कारण दरवर्षी 30,000 व्हिसा जारी केले जात आहेत, जे ते म्हणाले की "एक मोठी संख्या" आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT