Bangladesh Crisis Social Media
ग्लोबल

बांगलादेश हिंसाचार! सोशल मिडियावर 'ऑल आईज ऑन हिंदूज' हॅशटॅग ट्रेंड

Bangladesh Crisis: हा केवळ सोशल मिडिया हॅश टॅग नसून तो बांगलादेशातील हिंदू सहन करत असलेल्या हिंसाचाराच्या झळा आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

विद्यार्थी आंदोलनाने हिंसळ वळण घेतल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हासिना यांनी राजीनामा देत देश सोडला. हासिना यांच्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्याकडे आंतरिम सरकारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण, युनूस यांच्याकडे सूत्रे सोपविल्यानंतर देखील बांगलादेशमधील हिंसाचार कमी झाल्याचे दिसत नाही. देशात हिंदूंना लक्ष करत हिंसाचार सुरुच आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमातून समोर येणाऱ्या विविध वृत्तांनुसार, बांगलादेशची राजधानी ढाका येथे हिंसाचारात हिंदूंना लक्ष केलं जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ऑल आईज ऑन हिंदू इन बांगलादेश हा हॅश टॅग सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

गाजा येथील वादानंतर ऑल आईज ऑन राफा हॅश टॅग व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ऑल आईज ऑन हिंदू चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, हा केवळ सोशल मिडिया हॅश टॅग नसून तो बांगलादेशातील हिंदू सहन करत असलेल्या हिंसाचाराच्या झळा आहेत. तसेच, या हिंसाचाराला इस्लामी गट खतपाणी घालत असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून प्रकट होत आहेत.

१९७१ च्या युद्धात सहभागी कुटुंबियांना सरकारी नोकरीत ३० टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, या कोटा पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले.

विद्यार्थी आंदोलन म्हणून सुरु झालेल्या या आंदोलनात राजकारणाने प्रवेश केला. राजकीय पक्षानी विद्यार्थी आंदोलन हायजॅक करुन हिंसाचाराला प्रोत्साहन दिले. दिवसेंदिवस हिंसक होत गेलेल्या या आंदोलनामुळे तत्कालिन पंतप्रधान शेख हासिना यांना देश सोडून भारतात राजाश्रय घ्यावा लागला.

अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर देखील बांगलादेशात हिंसाचार सुरुच आहे. हिंदू विरोधात होत असलेल्या अत्याचाराविरोधात आत्तापर्यंत कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात रॅली काढण्यात आल्या. बांगलादेशमध्ये हिंदूच्या रक्षणासाठी सोशल मिडियावर सेव्ह हिंदू इन बांगलादेश कॅम्पेन जोर धरु लागले आहे.

देशात २०० ठिकाणंवार हिंसक घटना समोर आल्या आहेत. ५२ जिल्ह्यात हिंदू लोकांविरोधात हिंसक घटना घडल्या आहेत. निष्पाप नागरिकांची घरे जाळण्यात आली तर काही ठिकाणी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. देशातील अल्पसंख्याक लोकांचे रक्षण करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय स्तरावरुन बांगलादेशच्या आंतरिम सरकारला करण्यात आले आहे.

हिंदू लोकांनी देखील रस्त्यावर उतरत संरक्षणाची मागणी केलीय. बांगलादेश त्यांची मातृभूमी असून, ते तिथून कोठेही जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात लाखो हिंदू लोकांची पाकिस्तान सैनिकांनी कत्तल केली होती.

बांगलादेशमध्ये सुरु असणारा हिंसाचार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. हिंदू विरोधात सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत भारताकडून देखील बांगलादेशला सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT