Mahinda Rajapaksa
Mahinda Rajapaksa Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: महिंदा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र!

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेत शांततापूर्ण निदर्शनांदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. माजी पंतप्रधानांसह इतर सात जणांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका वकिलाच्या वतीने कोलंबो न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्यासह सात जणांना तात्काळ अटक करण्याचे आदेश सीआयडीला द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. (A petition has been filed in the court seeking the arrest of former Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa)

दरम्यान, महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या समर्थकांना शांततापूर्ण आंदोलनांवर हल्ले करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात 100 हून अधिक लोक जखमी झाले. यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या लोकांना गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले. विशेष म्हणजे श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे महिंदा राजपक्षे यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतरही श्रीलंकेतील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

राजपक्षे देश सोडून जाऊ शकत नाहीत

यापूर्वीच न्यायालयाने महिंदा राजपक्षे यांच्यासह अन्य 12 नेत्यांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. त्याच वेळी, सरकारच्या अपयशावर देशव्यापी विरोध होत असताना महिंदा यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. विरोधी पक्षही त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. श्रीलंकन​पीपल्स पार्टी (SLPP) नेते महिंदा हे 2005 ते 2015 या काळात देशाचे अध्यक्ष होते, ज्या दरम्यान त्यांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) विरुद्ध क्रूर लष्करी मोहीम चालवली होती.

रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान झाले

श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, जे आपल्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक टप्प्याचा सामना करत आहेत, त्यांची गुरुवारी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. 225 सदस्यांच्या संसदेत रानिल विक्रमसिंघे यांना फक्त एक जागा आहे. युनायटेड नॅशनल पार्टी (UNP) चे नेते विक्रमसिंघे (73) यांनी बुधवारी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्याशी संवाद साधला. श्रीलंकेचे चार वेळा पंतप्रधान राहिलेले विक्रमसिंघे यांना ऑक्टोबर 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान पदावरुन हटवले होते. मात्र, दोनच महिन्यांनंतर सिरिसेना यांनी त्यांना पुन्हा या पदावर बहाल केले.

विक्रमसिंघे यांनी चार मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला

दरम्यान, विक्रमसिंघे यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळात चार मंत्र्यांचा समावेश केला. GL Peiris यांचा मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, दिनेश गुणवर्धने यांनी सार्वजनिक प्रशासन मंत्री, पियर्स यांनी परराष्ट्र मंत्री, प्रसन्ना रणतुंगा यांनी शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री आणि कांचना विजेसेकरा यांनी ऊर्जा मंत्री म्हणून शपथ घेतली. महिंदा राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये (Government) पिरिस हे परराष्ट्र मंत्रीही होते. सरकारी सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विक्रमसिंघे यांच्या मंत्रिमंडळाचे संख्याबळ 20 असेल.

नवीन पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेत्याचा पाठिंबा मागितला

श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी मुख्य विरोधी पक्षाचे नेते समगी जना बालवेगया (SJB) यांना पक्षपाती राजकारण टाळून ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पक्षनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 73 वर्षीय युनायटेड नॅशनल पार्टी (UNP) नेते आणि माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी श्रीलंकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीला स्थिरता देण्यासाठी देशाचे 26 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News Update: मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी, चिंबल येथील महिलेची सायबर पोलिसांकडे तक्रार

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT