Hiroshima Twitter
ग्लोबल

Hiroshima Day 2022: जपानच्या जखमा अजूनही जिवंतच, 2 मिनिटांत हिरोशिमा झालं होतं उध्वस्त

6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8 च्या सुमारास अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. बॉम्ब पडताच 80 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

77th Anniversary of Hiroshima Nuclear Explosion: अमेरिकेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यापासून चीन आक्रमक झाला आहे आणि चिनने तैवान सीमेवर मोठ्या संख्येने आपले सैन्य तैनात केले आहे. अखंड युद्ध सराव सुरू असून क्षेपणास्त्रांच्या चाचण्याही सुरू आहेत. दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे. जर युद्ध झाले तर अमेरिका यात तैवानच्या समर्थनात येऊ शकते.

या वातावरणाने 77 वर्षांपूर्वीच्या दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज 6 ऑगस्ट आहे आणि हा काळा दिवस आहे ज्याला जग हिरोशिमा डे म्हणून ओळखतात. जपानला हा दिवस आजपर्यंत विसरता आला नाही. 1945 मध्ये या दिवशी अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला होता. इतिहासाची पाने चाळताना 6 ऑगस्ट 1945 ची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.

या हल्ल्याची कल्पनाही कोणी केली नव्हती

दुसरे महायुद्ध 1939 मध्ये सुरू झाले. बघता बघता युद्धाला 6 वर्षे झाली, पण जपानची आक्रमक वृत्ती थांबण्याचे नाव घेत नव्हती. 1945 च्या सुमारास युद्धाला अधिक गती मिळाली. अमेरिकेला आता जपानला धडा शिकवायचा होता. 6 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी असे काहीतरी करण्याची योजना आखली ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. अचानक 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8 च्या सुमारास अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. बॉम्ब पडताच 80 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अणुस्फोटानंतर निर्माण झालेल्या उष्णतेमुळे लोक जळू लागले.

1-2 मिनिटांत हिरोशिमा शहराचा 80 टक्के भाग नष्ट झाला. इतकेच नाही तर, मृत्यूशिवाय, हजारो लोक काही महिन्यांनंतर न्यूक्लियर रेडिएशनशी संबंधित आजारांमुळे हळूहळू मरण पावले. या स्फोटाबाबत केलेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले की बॉम्ब टाकल्यापासून 29 किमीच्या परिघात काळा पाऊस पडला, ज्यामुळे मृतांची संख्या वाढली.

9 ऑगस्टला अमेरिकेने दुसरा हल्ला केला

हिरोशिमा हल्ल्यातून जपान अजून सावरला नव्हता की अमेरिकेने 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्याच्या नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला. या हल्ल्यात 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर अनेक वर्षांनी अणुविकिरणामुळे आजूबाजूच्या परिसरात अपंग मुले जन्माला आली, असे सांगितले जाते. या दोन्ही स्फोटांनंतर जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपले.

अजूनही त्या हल्ल्यांच्या खुणा आहेत

आण्विक हल्ल्यांनंतर लाखो लोक किरणोत्सर्गाचे बळी ठरले. यापैकी बरेच जण अजूनही जिवंत आहेत आणि वैद्यकीय सुविधा आणि उपचारांसाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. वर्षभरापूर्वी तेथील न्यायालयाने 84 जणांना वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश दिले होते. अण्वस्त्र हल्ल्यानंतर त्या भागात 4 हजार अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता होती. अमेरिकेने हिरोशिमामध्ये आयओ ब्रिजजवळ अणुबॉम्ब टाकण्याची योजना आखली होती, पण विरुद्ध दिशेने वारा वाहत असल्याने तो शिमा सर्जिकल क्लिनिकवर पडला.

अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर काही मिनिटांतच शहरातील 30 टक्के लोकांचा मृत्यू झाला. जे वाचले ते अपंगत्वाचे बळी ठरले. अणुस्फोटानंतर हिरोशिमामधील सर्व काही नष्ट झाले. बर्‍याच वर्षांनंतर कनेर (ऑलिअँडर) नावाचे फूल येथे प्रथमच उमलले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

Lotulim Land Scam: लोटलीत जमीन विक्री घोटाळा उघड! राजकारण्याची गुंतवणूक असल्याचे उघड; संशयित ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT