Chandrayaan-3 Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3: चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारताची ताकद वाढणार, 'या' फायद्यासंह...

Chandrayaan-3 Landing Time: चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यापासून भारत अवघ्या काही पावलांच्या अंतरावर आहे.

Manish Jadhav

Chandrayaan-3 Landing Time: चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यापासून भारत अवघ्या काही पावलांच्या अंतरावर आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.4 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.

चंद्रावर उतरण्याचा भारताचा हा सलग दुसरा प्रयत्न असेल. यामुळे भारताला मोठा आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

चांद्रयान-3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) तिसरी चंद्र मोहीम आहे आणि ती यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट-लँड करणारा अमेरिका, पूर्वीचे सोव्हिएत युनियन (आता रशिया) आणि चीननंतर (China) भारत हा चौथा देश असेल.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर चंद्रावर रोव्हर तैनात करण्याची आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्याची योजना आहे. तज्ज्ञांच्या मते, चांद्रयान-3 च्या यशाचा भारताच्या (India) अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

अंतराळाशी संबंधित प्रयत्नांचे दैनंदिन फायदे जगाने आधीच पाहिले आहेत, जसे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाण्याच्या पुनर्वापरासह स्वच्छ पाण्याचा वापर, स्टारलिंकद्वारे इंटरनेटचा प्रसार, वाढलेली सौरऊर्जा निर्मिती आणि हेल्थ टेक्नॉलॉजी.

उपग्रह प्रतिमा आणि नेव्हिगेशनच्या जागतिक डेटाच्या वाढत्या मागणीसह, अनेक अहवाल दर्शवतात की जग आधीच स्पेस इकॉनॉमीच्या भरभराटीच्या टप्प्यात आहे.

'स्पेस फाऊंडेशन'ने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था $ 546 अब्जच्या मूल्यावर पोहोचली आहे. हा आकडा गेल्या दशकात या मूल्यात 91 टक्के वाढ दर्शवतो.

भारताची ताकद वाढेल

दरम्यान, भारताची स्पेस इकॉनॉमी 2025 पर्यंत $13 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग भारताच्या तांत्रिक क्षमतेची ताकदही दर्शवले.

अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने 50 वर्षांपूर्वी अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावर मानवाला यशस्वीरित्या उतरवले होते, परंतु आता असे दिसते की, बरेच लोक तिथे पोहोचण्यासाठी उचललेली पावले आणि मोठ्या प्रमाणात खर्च केलेले पैसे विसरले आहेत.

चांद्रयान-1 सह चंद्रावर पोहोचण्याचा भारताचा पहिला प्रयत्न जवळजवळ सर्व उद्दिष्टे आणि वैज्ञानिक उद्दिष्टांमध्ये यशस्वी ठरला, ज्यात प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे पुरावे सापडले.

पण दोन वर्षांच्या नियोजित या मोहिमेचे 312 दिवस पूर्ण केल्यानंतरच इस्रोचा अंतराळयानाशी संपर्क तुटला होता. 6 सप्टेंबर 2019 रोजी, चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत, भारताने प्रज्ञान रोव्हर घेऊन विक्रम लँडरसह चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता.

तथापि, चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर अंतरावर लँडरचा संपर्क तुटला होता आणि नंतर नासाने घेतलेल्या छायाचित्रांनी ते चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्याची पुष्टी केली.

चांद्रयान-2 मधून मिळालेले धडे

चांद्रयान-2 मधून धडा घेऊन चांद्रयान-3 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. लक्ष्यित लँडिंग क्षेत्र 4.2 किमी लांबी आणि 2.5 किमी रुंदीपर्यंत वाढवण्यात आले आहे.

चांद्रयान-3 मध्ये लेझर डॉप्लर व्हेलोसिमीटरसह चार इंजिन देखील आहेत ज्याचा अर्थ ते चंद्रावर उतरण्याच्या सर्व टप्प्यांमध्ये त्याची उंची आणि अभिमुखता नियंत्रित करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

NCERT Dancing Girl Controversy: इतिहासाशी छेडछाड! 4500 वर्षांपूर्वीच्या 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालण्याचा एनसीईआरटीचा अजब पराक्रम; पुरातत्त्वशास्त्राची ऐशीतैशी

Trigrahi Yog 2026: नशिबाची साथ आणि धनलाभाचा योग! गुरु-चंद्र-शुक्र युतीमुळे 7 राशींचे भाग्य उजळणार; 'त्रिग्रही योग' ठरणार वरदान

Goa Politics: '31 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, नाहीतर... ' वाढीव वीजबिलांवरुन केजरीवाल आक्रमक; गोवा सरकारला दिला अल्टिमेटम

खरी कुजबुज: ना घरका, ना घाटका!

SCROLL FOR NEXT