Violent protests continue for second day in West Bengal  Dainik Gomantak
देश

पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने सुरू

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत जमावाला पांगवले.

दैनिक गोमन्तक

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत जमावाला पांगवले. मिळालेल्या माहितीनुसार, हावडा येथील पंचला बाजार येथील ताजी घटना आहे. येथे पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली.

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, हावडा आणि राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. 15 जूनपर्यंत कलम 144 लागू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कालही अनेक ठिकाणी जाळपोळ झाली
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी निदर्शने केली. शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने लोक बाहेर आले आणि त्यांनी नुपूर शर्माच्या अटकेची मागणी केली. याशिवाय पश्चिम बंगालच्या हावडामध्येही मोठा गोंधळ झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने नमाज्यांनी हावडा येथील राष्ट्रीय महामार्ग 116 वर निदर्शन केले. यादरम्यान वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, अग्निशमन दल, ट्रक आदी वाहतूक कोंडीत अडकली. सीएम ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. सुमारे 10 हल्लेखोरांना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT